मुंबईत सलग पाचव्या दिवशी दीड हजारापेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी १७८८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर पुन्हा एकदा वाढला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही पुन्हा एकदा वाढली आहे. तर आतापर्यंत सव्वा लाख रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी १७८८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या १ लाख ५७ हजार ४१० वर गेली आहे. तर एका दिवसात १५४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एक लाख २५ हजाराहून अधिक रुग्ण म्हणजेच ७९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या २४, १४४ रुग्ण उपचार घेत आहेत. मृतांची एकूण संख्या ७८९७ वर गेली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर पुन्हा एकदा एक टक्कय़ाच्या पुढे गेला आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ९० दिवसांवरून थेट ६७ दिवसांवर आला आहे. मुंबईत आतापर्यंत आठ लाख ३४ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. बोरिवली, कांदिवली, वांद्रे पूर्व, दहिसर, मुलुंड, गोरेगाव भागातील रुग्णवाढीचा दर सर्वात जास्त आहे. अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले पूर्वचा भाग असलेल्या के पूर्वमध्ये, मालाड पी उत्तर आणि बोरिवलीचा समावेश असलेल्या आर मध्य मध्ये बाधितांचा एकूण आकडा प्रत्येकी नऊ हजारांच्यापुढे गेला आहे. विभाग एका दिवसातील रुग्ण एकूण रुग्ण बोरिवली १६० ९१०५ अंधेरी पश्चिम १३४ ८८२८ अंधेरी पूर्व १२३ ९३१० कांदिवली ११३ ७८५४ नानाचौक,ग्रॅंटरोड १०५ ६६७५ मालाड १०३ ९२४९