मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.   राज्यामध्ये जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान स्वाईन फ्लूचे तीन हजार रुग्ण आढळून आले आहेत, तर २९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातही जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये अधिक रुग्ण आढळून आले असून, १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा >>> Mumbai Weather Update : पारा पुन्हा ३७ अंशांवर जाण्याचा अंदाज

राज्यात हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना आता स्वाईन फ्लूचाही धोका वाढू लागला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यामध्ये स्वाईन फ्लूचे ३००३ रुग्ण आढळले. यामध्ये जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये १०५५ रुग्ण सापडले असून, १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एच१एन१चे ५३७ रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच एच३एन२ चे ५१८ रुग्ण आढळले असून, ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांमध्ये १९४८ रुग्ण सापडले असून, १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एच१एन१ चे ४९७ रुग्ण सापडले तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एच३एन२ चे सर्वाधिक १४५१ रुग्ण सापडले आहेत. यामुळे एच१एन१ चे आतापर्यंत २२ तर एच३एन२ ने सात जणांचा मृत्यू झाला आहे. दहा महिन्यांत राज्यात स्वाईन फ्लूचे १३ लाख ८८ हजार ३४२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ६२ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

एच३एन२ चे सर्वाधिक रुग्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहा महिन्यांत राज्यात स्वाईन फ्लूचे १३ लाख ८८ हजार ३४२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. एच३एन२ चे सर्वाधिक १४५१ रुग्ण सापडले आहेत.