राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन दिला जाणार असून त्याबाबत अर्थखात्याशी चर्चा सुरु आहे, असे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सोमवारी येथे सांगितले. विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी एक हजार कोटी रुपये देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
आगामी संसद अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्य़ाद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राधामोहन सिंह बोलत होते.
केंद्र सरकारने अजून कोणत्याही राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत दिलेली नसून महाराष्ट्राला भरीव मदत दिली जाईल, असे सिंह यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture minister promised additional funds drought suffer
First published on: 17-02-2015 at 12:01 IST