मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी मंगळवारी ब्लॉक घेतला जाणार असून त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळावर परिणाम होणार आहे. एकीकडे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी, त्यांना वेगात आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडल्या जात आहेत. मात्र ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांचा खोळंबा होणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त बहुतांश जण कुटुंबियांसह बाहेरगावी निघाले आहेत. नियमित रेल्वेगाड्यांवरील प्रवाशांचा भार कमी होण्यासाठी, जादा रेल्वेगाड्या चालवल्या जात आहेत. मात्र ब्लॉकमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडणार आहे. कोकण रेल्वेच्या करंजाडी – चिपळूण विभागात मंगळवारी दुपारी १.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत असा २.३० तासांचा ब्लॉक असणार आहे. तर, या कालावधीत अनेक रेल्वेगाड्यांना लाल सिग्नल दाखवला जाणार आहे.

Konkankanya, Janshatabdi,
जनशताब्दी, कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६ हजारांवर
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Konkan Journey on Vande Bharat Express, 2 hours extra journey konkan Vande Bharat Express, Vande Bharat Express 2 Hours extra journey, Mumbai Goa Route, Monsoon Schedule, konkan railway monsoon Schedule, Vande Bharat Express slow down, Konkan Journey by Vande Bharat Express, marathi news, konkan railway news,
कोकणातील वंदे भारतचा प्रवास दोन तासांनी वाढणार
Passenger s Mobile Phone Stolen, Passenger s Mobile Phone Stolen at Train Door, Mobile Phone Stolen Konkan Railway, konkan railway train mobile phone Stolen, ratnagiri to Mumbai journey, ratnagiri to Mumbai train journey,
कोकण रेल्वे प्रवासात दरवाजात उभे राहून मोबाईल हातात ठेवणे महाग पडले

हेही वाचा – राज्यातील २१२ गृहप्रकल्पांबाबत महारेरा साशंक, प्रकल्प सुरू झाले की नाही याची माहितीच महारेराकडे नाही

हेही वाचा – पंतप्रधान आवास योजना, राज्याची वाटचाल संथगतीनेच! अद्याप दोन लाख घरांच्या कामाला प्रारंभ नाही

ब्लॉक कालावधीत गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस सावंतवाडी रोड ते रत्नागिरी दरम्यान १०० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुअनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेस कोलाड ते वीर दरम्यान ५० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक ०२१९७ कोईम्बतूर – जबलपूर विशेष एक्स्प्रेस रत्नागिरी – कामठे स्थानकांदरम्यान ७० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. सुमारे एक ते दोन तास रेल्वेगाड्यांना थांबा दिल्याने इतर रेल्वेगाड्याही विलंबाने धावतील. परिणामी, या मार्गावरील प्रवासाचा कालावधी वाढणार आहे.