मुंबई – मुंबईत असलेल्या खुल्या जागा आंदण देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेले धोरण चुकीचे आणि घटना विरोधी असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केला आहे. हे धोरण रद्द न केल्यास मुंबई काँग्रेस न्यायालयात जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईतील मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे दत्तक तत्त्वावर देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रस्तावित धोरणाला काँग्रेसने विरोध केला आहे. या धोरणाला सामाजिक कार्यकर्त्यांनीही विरोध केला आहे. या धोरणाच्या मसुद्यावर नागरिक व संस्था यांनी ३० दिवसांच्या आत म्हणजे दिनांक १० ऑक्टोबरपर्यंत सूचना व हरकती पाठवाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Meet who is MBBS Dr Pinki Haryana
Who is Pinki Haryan : इच्छा तिथे मार्ग! भिक्षा मागणारी मुलगी बनली डॉक्टर, झोपडपट्टीत राहिलेल्या पिंकीची यशोगाथा तुम्हालाही देईल प्रेरणा!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
MPSC Agricultural Services, MPSC, court order,
‘एमपीएससी’ कृषी सेवा: न्यायालयाच्या आदेशानंतरही नियुक्ती देण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ?
youth congress taluka president rape
चंद्रपूर: तालुका युवक काँग्रेसच्या नेत्यावर अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचाराचा केल्याचा आरोप, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
mumbai municipal corporation
मुंबई: महापालिकेतील उपायुक्तांची पुन्हा खांदेपालट, राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्याकडे प्रथमच शिक्षण विभागाची जबाबदारी
Aaditya Thackeray On IND vs BAN Test Series
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक ठाकरे गटाच्या युवा सेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव,आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर युवा सेनेच्या उमेदवारांची बैठक
Dharavi News in Marathi
Dharavi Masjid : धारावीत मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या गाडीची तोडफोड, शेकडो मुस्लिमांचा जमाव एकवटला
amit thackeray
Amit Thackeray : “मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे रात्रीस खेळ चाले”; सीनेट निवडणुकीच्या स्थगितीवरून अमित ठाकरेंची खोचक टीका

हेह वाचा – मुंबई : छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक, २९ वर्षांपूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी

मुंबई काँग्रेसतर्फे शुक्रवारी आझाद मैदान येथील मुंबई विभागीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात याच विषयावर पुढील दिशा ठरवण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी विविध स्वयंसेवी संस्थाना बोलावण्यात आले होते. यात माजी खासदार प्रा. भालचंद्र मुणगेकर, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद, रोहित जोशी, संजीव वल्सन, ब्रायन आदी उपस्थित होते. मुंबई पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली आणि मागील आठ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सर्व खुल्या जागा आणि उद्याने पालिकेनेच परिरक्षण करण्यावर भर दिला. वनशक्तीचे स्टॅलिन दयानंद यांनी मुंबईतील अज्ञात असलेल्या वनांची माहिती देत त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

हेही वाचा – ठाण्यातील आर्थिक दुर्बल घटकांची म्हाडा घरे महाग! निश्चित किमतीत विकासकाकडून परस्पर सहा लाखांची वाढ

माजी खासदार संजय निरुपम यांनी वांद्रे पश्चिम येथे एक विशाल निर्दशने स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून करण्याची सूचना केली तर प्रा मुणगेकर यांनी अन्य देशांप्रमाणे शासनानेच खुल्या जागांचा सांभाळ करावा, असा मुद्दा मांडला. बैठकीच्या शेवटी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी येत्या सोमवारी पालिका आयुक्तांना भेटून निवेदन देणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर धोरण रद्द नाही केले तर न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी माजी आमदार अशोक जाधव, माजी नगरसेवक अशरफ आजमी, जगदीश अण्णा अमीन, शीतल म्हात्रे, गणेश यादव, झिया उररहमान वाहिदी, प्रणिल नायर, प्रमोद मांद्रेकर उपस्थित होते.