लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: चेंबूर येथे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भरधाव वेगात आलेली मोटारगाडी चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांब्यावर धडकली. या अपघातात दोन महिलांसह पाचजण जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सांताक्रूझ येथून निघालेली एक एर्टीगा मोटारगाडी शनिवारी मध्यरात्रीनंतर ठाण्याच्या दिशेला जात होती. भरधाव वेगात आलेली मोटारगाडी टिळकनगर उड्डाणपुलावरून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबावर आदळली. या भीषण अपघातात मोटारगाडीचे प्रचंड नुकसान झाले. टिळकनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने गाडीत अडकलेल्या पाच जणांना बाहेर काढून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

आणखी वाचा-मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत तोकड्या मनुष्यबळामुळे रुग्णसेवेवर परिणाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातातनंतर या परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी वेळीच अपघातग्रस्त गाडी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याबाबत टिळकनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.