मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. निकालानंतर अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच पुढील परीक्षेसाठी तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुढील आठ दिवस समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. हे समुपदेशक सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या बारावीचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. त्यात काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, तर काहींना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांचे नकारात्मक विचार वाढीला लागून ते मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता आहे.

मानसिक तणावाखाली विद्यार्थी चुकीचे पाऊल उचलू नयेत यासाठी राज्य मंडळाने परीक्षेचा निकाल जाहीर होताच अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी विभागीय स्तरावर ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळाकडून समुपदेशकांचे भ्रमणध्वनी जाहीर केले आहेत. ही सेवा निकालाच्या दिवसापासून सलग ८ दिवस सुरू राहणार आहे. समुपदेशक सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे नि:शुल्क, आवश्यक ते समुपदेशन करणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे. त्या परीक्षेतील यशानंतर त्यांना आपल्या आवडीनुसार विविध क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. या माध्यमातून स्वत:ची आणि पर्यायाने देशाची प्रगती साधण्याची संधी मिळणार असल्याने ते या संधीचे सोने करतील, असा विश्वास आहे. तथापि, ही परीक्षा हे अंतिम ध्येय नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे आणि यश संपादन करावे, असा सल्ला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बारावीच्या परीक्षेत अपेक्षित यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक ९०११३०२९९७, ८२६३८७६८९६, ८७६७७५३०६९, ७३८७४००९७०, ९९६०६४४४११, ७२०८७७५११५, ८१६९२०२२१४, ९८३४०८४५९३, ८३२९२३००२२, ९५५२९८२११५