नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता, तर पुढचा पेच प्रसंग टाळता आला असता, अशी भूमिका आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मांडण्यात आली होती. यावरून विविध राजकीय चर्चा सुरू असतान यावर काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – संजय राऊतांनी नाना पटोलेंबाबत केलेल्या विधानाचं दिलीप वळसे पाटलांकडून समर्थन; म्हणाले, “विधानसभा अध्यक्षपद…”

हेही वाचा – ‘मविआचं सरकार पडण्यामागचं मुख्य कारण म्हणजे नाना पटोलेंनी…’, ठाकरे गटाची टीका; ‘त्या’ घटनेवर व्यक्त केली नाराजी!संजय राऊतांनी नाना पटोलेंबाबत केलेल्या विधानाचं दिलीप वळसे पाटलांकडून समर्थन; म्हणाले, “विधानसभा अध्यक्षपद…”

काय म्हणाले अतुल लोंढे?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी किंवा घाईने हा निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असे अतुल लोंढे यांनी दिली आहे.

काँग्रेस पक्षात एक निर्णय प्रक्रिया आहे. त्यानुसारच निर्णय घेतले जातात. पक्षाध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला की पक्षातील सर्वजण त्याचा मान राखतात व त्यानुसार त्याची अंमलबजावणीही केली जाते. सोनिया गांधी यांनी त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून पक्षहितासाठी घेतलेला तो निर्णय होता, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “…तर महाविकास आघाडी सरकार टिकलं असतं”; विजय वडेट्टीवारांचा नाना पटोलेंना घरचा आहेर

नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकारसमोर संकटाची मालिका सुरु झाली. या आरोपात काहीही अर्थ नाही. जर नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी कायम असते, तर पुढचा प्रसंग टळला असता. या ‘जर-तर’ ला राजकारणात काहीच अर्थच नसतो. नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळेच मविआ सरकार अडचणीत आले असे म्हणणे योग्य नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस पक्षाने काय निर्णय घ्यावेत, हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे. काँग्रेसचा निर्णय चुकीचा ठरला असा आरोप करून मित्रपक्षाच्या निर्णयावर आक्षेप घेणे व त्यावर अशी जाहीरपणे टीका करणे, आघाडीच्या धर्माला अनुसरुन नाही, असेही लोंढे म्हणाले.