मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून १ मार्च २०२० मध्ये काढण्यात आलेल्या घरांच्या सोडतीतील यशस्वी पात्र गिरणी कामगार किंवा वारसांपैकी १३३१ कामगारांना घराची १० टक्के रक्कम भरण्यासाठी ८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बॉम्बे डाईंग, स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांच्या ३८९४ घरांसाठी २०२० मध्ये सोडत काढण्यात आली होती. या सोडतीतील घरांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे आता मुंबई मंडळाने या घरांचा ताबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – एचडीआयएलचे राकेश व सारंग वाधवान विरोधात गुन्हा, ८८ कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण

हेही वाचा – दर्शन सोलंकीची आत्महत्या जातीभेदाच्या छळाला कंटाळून, माजी खासदार मुणगेकर यांचा आरोप; एसआयटीकडे तपास सोपविण्याच्या मागणीसाठी होणार आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या सोडतीतील विजेत्यांची पात्रता निश्चितीची प्रकिया सुरू झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत पात्र ठरलेल्या १३३१ विजेत्यांना ई देकार पत्र पाठविण्यात आले आहे. देकार पत्र मिळाल्यापासून ४५ दिवसांत घराच्या विक्री किमतीपैकी १० टक्के रक्कम भरणे आवश्यक असते. त्यानंतर पुढील रक्कम भरून घराचा ताबा घेता येतो. वेळेत रक्कम भरली नाही वा मुदतवाढीचा अर्ज केला नाही तर घराचे वितरण रद्द होते. मात्र गिरणी कामगारांसाठी सरकार आणि म्हाडाकडून काहीसे लवचिक धोरण अवलंबिले जाते. त्यानुसार देकार पत्र प्राप्त झालेल्यांपैकी ज्या ११४ जणांनी पहिला १० टक्के रकमेचा हप्ता भरलेला नाही त्यांना ८ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.