लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन रेल्वे पोलीस ठाणी स्थापन करण्याचे नियोजन असून त्यासाठी सुमारे ९०० अतिरिक्त पोलिसांची आवश्यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सध्या अंतिम टप्प्यात आहे.

Nagpur, Bombay High Court, MSRDC, Nagpur Bench of Bombay High Court, Samruddhi mahamarg, vehicle inspections, Transport Department, Public Interest Litigation,
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समृद्धी महामार्गावरून प्रवास, अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल….
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
black ribbons, Dombivli to Kasara,
डोंबिवली ते कसारा परिसरातील २० हजारांहून अधिक प्रवाशांचा काळ्या फिती लावून रेल्वे प्रवास
Pune Metro, Yerawada Station, Mahametro, train frequency, passenger services, Pimpri Chinchwad, District Court, Vanaz, Ramwadi,
पुणेकरांना खुशखबर! मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ; प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी
Matsyagandha Express, Mumbai, Mangaluru, train safety, railway infrastructure, roof collapse, Linke Hoffman Busch (LHB) coaches, Southern Railway, passenger safety, Konkan Railway,
मृत्यूच्या छायेत प्रवाशांचा रेल्वे प्रवास, मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या छताचा काही भाग पडला
High Court order to traffic police regarding traffic outside Bandra East station Mumbai
वांद्रे पूर्व स्थानकाबाहेरील वाहतूक कोडींवर तातडीने मार्ग काढा; नागरिकांच्या गैरसीयीची दखल घेऊन उच्च न्यायालयाचे वाहतूक पोलिसांना आदेश
Runway at Pune airport closed for half hour on Wednesday passengers inconvenienced due to flight delays
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्याच्या पुण्यातच प्रवाशांची ‘वाऱ्यावरची वरात’!
Action of Dombivli police against ordinary passengers traveling in reserved local coach for disabled
अपंगांच्या राखीव लोकल डब्यातून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांवर डोंबिवली पोलिसांची कारवाई

मुंबई महानगराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबई रेल्वे पोलीस ठाण्यांचा विचार केल्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुंबईतील विविध रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १० हजार ३६१ गुन्हे दाखल झाले आहेत. लोकलच्या तिन्ही मार्गांवर एकूण १७ रेल्वे पोलीस ठाणी असून या पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे चार हजार अधिकारी – पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षा घेता आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस चार नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव सध्या गृहविभागात अंतिम टप्प्यात आहे.

हेही वाचा… मुलुंडमधील एम टी अगरवाल सुपर स्पेशालिटी रुग्णालय नववर्षात रुग्णांच्या सेवेत; १२ लाखांपेक्षा अधिक रुग्णांना होणार लाभ

मध्य रेल्वे मार्गावर कल्याण रेल्वे स्थानकानंतर थेट कसारा रेल्वे पोलीस ठाणे आहे. या दोन रेल्वे पोलीस ठाण्यांमधील अंतर ६७ किलोमीटर असून त्यादरम्यान सुमारे १२ स्थानकांचा समावेश आहे. दुसरीकडे कर्जत मार्गावर कल्याणनंतर थेट कर्जत रेल्वे पोलीस ठाणे आहे. त्या दोन स्थानकांमधील अंतर सुमारे ४६ किलोमीटर आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण जंक्शनवर प्रमुख एक्स्प्रेस आणि लोकल थांबतात. शहाड, आंबिवली, टिटवाळा, वाशिंद, आसनगाव, खर्डी येथे मोठया संख्येने वसाहती आहेत. तेथून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहाड ते खर्डीदरम्यान काही घटना घडल्यास तक्रारदारांना तक्रार करण्यासाठी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात जावे लागते. तसेच उल्हासनगर, अंबरनाथ, नेरळ, भिवपुरी येथे लोकवस्त्या वाढत असून तेथून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईत येतात.

हेही वाचा… शीवमध्ये चारचाकी गाडीचा पहाटे अपघात, दोन ठार, तीन जखमी; दुभाजकाला धडकल्यामुळे गाडीने पेट घेतला

पश्चिम मार्गावरील प्रवशांची सख्या वाढत असल्यामुळे बोरिवली व वसई दरम्यानही एका रेल्वे स्थानकाची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. बोरिवली रेल्वेची हद्द जोगेश्वरी – दहिसर, वसई रेल्वे पोलिसांची हद्द मीरा रोड – विरारपर्यंत आहे. भाईंदर येथील नवीन पोलीस ठाण्यामुळे वसई रेल्वे भार हलका होणार आहे. तसेच मुंबईतील कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसवरील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. येथून दररोज सुमारे ६० लांबपल्ल्याच्या रेल्वे सुटतात.

हेही वाचा… मुंबई गोवा महामार्ग खरंच सुधारणार? रवींद्र चव्हाणांचा पाचवा दौरा!

एलटीटीमध्ये सध्या दररोज दीड लाखाहून अधिक प्रवासी येतात. एलटीटी स्थानक सध्या कुर्ला रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येते. पण कुर्ला रेल्वे पोलिसांची हद्द व वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता एलटीटीमध्येही स्वतंत्र रेल्वे पोलीस ठाणे सुरू करावे, असे प्रस्तावात म्हटले आहे. या पोलीस ठाण्याअंतर्गत गोवंडी, मानखुर्द आणि हार्बर मार्गावरील वडाळा ते गोरेगाव स्थानकांमधील स्थानकांचा समावेश करता येतील. त्यामुळे कुर्ला रेल्वे पोलिसांचा बराचसा भार हलका होईल. त्यासाठी रेल्वे पोलिसांना सुमारे ९०० अतिरिक्त पोलिसांची आवश्यकता आहे. हा प्रस्ताव रेल्वे पोलिसांकडून राज्य पोलिसांकडे व तेथून पुढे गृहविभागाकडे पाठवण्यात आला होता. पोलीस ठाण्यांमुळे रेल्वे पोलिसांचे संख्याबळ वाढणार असल्यामुळे अर्थ नियोजनाच्या दृष्टीने प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.