Eknath Shinde on Mumbai Rain : मुंबईत सकाळपासून कोसळत असलेल्या पावसाने ६९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. यंदा ६९ वर्षांनी पावसाने लवकर हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यापासूनच आगमनाची वर्दी देणारे मोसमी वारे मुंबईत सोमवारी दाखल झाले. त्यामुळे पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईकरांची दैना केली आहे. दरम्यान, यावरून मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील स्थितीबाबत माहिती दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, “कंट्रोल रुममधून सर्व स्पॉट पाहिले आहेत. मिलन सबवे, हिंदमाता, अंधेरी, सायन येथील पाणी ओसरलं आहे. तिथे पंपाची व्यवस्था केली आहे. पाऊस जूनच्या १० तारखेपर्यंत येतो. तेवढी तयारी करतो. पण आता पाऊसच अगोदर आला. नरीमन पॉइंटला २५२ मीमी पाऊस पडला. महापालिका मुख्यालयात २१४ मीमी पडला. ५० -५० मीमी पावसाची अपेक्षा असलेल्या ठिकाणी जास्त पाऊस पडला. त्यामुळे ढगफुटीसारखं झालं. पण आता सर्व सुरळीत झालं आहे. वाहतूक सुरळीत झाली.

“नालेसफाईही सुरू आहे, तीही पूर्ण होईल. एकंदरीत पावसानेच लवकर आगमन केल्याने धावपळ झाली आहे. यातून नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी मुख्यमंत्री आणि बीएमसीची बैठक घेतली होती. यामध्ये इतर रेल्वे, पीडबल्यूडी, एमएमआरडीसह आर्मी,नेवी, एनडीआरएफसह सर्व अलर्ट आहेत. लोकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी मुंबई महापालिका घेईल.

नालेसफाईसाठी एआयचा वापर

“नालेसफाईसाठी एआयचा वापर करण्यात आला आहे. रोबोटच्या सहाय्याने साफसफाई केली जात आहे. लोकांनाही व्हिडिओ तत्काळ अपलोड करण्याची यंत्रणा सुरू केली आहे. जिथे पाणी असेल, नालेसफाई झाली नसेल तिथून तत्काळ व्हिडिओ अपलोड करता येईल आणि याची महापालिका दखल घेईल”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरळीतील भुयारी मेट्रो स्थानकात पाणी साचल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “आश्विनी भिडे यासंदर्भात माहिती पाठवतील. लोकांना येण्याच्या मार्गावर भिंत बांधली नसून बंड बांधला आहे. तिथे काम सुरू आहे. ही मेट्रो आत्ताच सुरू केली असून ते काम पूर्ण केलं जाईल. जिथून पाणी येतंय, तिथे पाणी येण्याचा मार्ग बंद करतील.”