संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील प्रारंभीचा प्रश्नोत्तरांचा तास रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्षांकडून टीका केली जात असली तरी, महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनातही प्रश्नोत्तरांचा तास होणार नाही. काही महत्त्वाची विधेयके  व खास करून पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्यावर महाविकास आघाडी सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे संसदेचे व राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यंदा विलंबाने होत आहे. संसदेचे अधिवेशन १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत होत आहे. मात्र या वेळी अधिवेशनाच्या प्रारंभीचा प्रश्नोत्तरांचा तास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. देशातील करोना व आर्थिक परिस्थितीवर प्रश्न विचारण्याची सदस्यांची संधी हिरावून घेतली जात असल्याची टीका विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No question and answer session in the legislative assembly abn
First published on: 04-09-2020 at 00:03 IST