लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे एका चाळीची संरक्षक भिंत पडून झालेल्या दुर्घटनेत एका इसमाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मोहम्मद अकबर याचा मृत्यू झाला.
आणखी वाचा-पदपथांवरील बोलार्डमुळे अंधेरीवासियांनाही त्रास, अंधेरी कुर्ला मार्गावर ठिकठिकाणी बोलार्ड
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
कुलाबा येथील कफ परेड परिसरात केंद्रीय विद्यालय क्रमांक ३ जवळ गजाली दर्गाहच्या परिसरात, मिया चाळीत ही दुर्घटना घडली. दुपारी तीनच्या सुमारास चाळीची संरक्षक भिंत अचानक पडली. त्या भिंतीखाली मोहम्मद अकबर हा ३८ वर्षांचा तरूण गाडला गेला होता. त्याला बाहेर काढून जवळच असलेल्या अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.