मध्य रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या लोकल महागड्या तिकिटांमुळे रिकाम्या जातात. प्रवाशांची या लोकलला गर्दी नसते. या लोकलमुळे नियमितच्या लोकलचे वेळापत्रक मागेपुढे झाले. अशी चौफेर चर्चा, टीका प्रवाशांकडून केली जाते. मात्र, तापमानाचा पारा ४० च्या वर गेल्यापासून उन्हाच्या काहिलीने, घामांच्या धारांनी हैराण झालेले प्रवासी थोडी खिशाला कात्री लावत, पण गारेगार वातानुकुलित लोकलमधून प्रवास करू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन महिन्यांपासून डोंबिवली रेल्वे स्थानकात सकाळी ८.५९ ला कल्याणहून येणारी वातानुकुलित लोकल मोजकेच प्रवासी चढून सुरू व्हायची. उन्हाचा पारा वाढल्यापासून डोंबिवली रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळेत कल्याणहून येणारी वातानुकुलित लोकल प्रवाशांनी गच्च भरलेली असते. कल्याणहून प्रवासी बसून, उभे राहून येतात. एवढी गर्दी या लोकलला वाढू लागली आहे, असे या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले. यापूर्वी मोजकेच प्रवासी नियमित या लोकलने प्रवास करत होते. ही परिस्थिती वाढत्या तापमानामुळे बदलली आहे, असे प्रवासी सांगतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers are preferring ac locals on central railway as temperature is rising sgy
First published on: 04-04-2022 at 12:37 IST