मुंबई: पहिली ते दहावी सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक असल्याच्या शासनाच्या धोरणाची जाणिव नवा अभ्यासक्रम आराखडा तयार करताना ठेवण्यात आलेली नाही. मराठीची भाषेची उपेक्षा करण्यात येत आहे, ती तत्काळ थांबवावी, अशी मागणी माजी खासदार अनिल देसाई यांनी केली आहे. तसेच साडेतिनशे पानांच्या आराखड्यावर अभिप्राय देण्यासाठी अवघे आठ दिवस देण्यात आले आहेत. अभिप्रायासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राज्याचा अभ्यासक्रम आराखडा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जाहीर केल्यापासून वादग्रस्त ठरला आहे. आराखड्यावर अभिप्राय नोंदवण्यासाठी ३ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ती ३० जूनपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. त्याबाबत त्यांनी परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांना पत्र लिहिले आहे. आराखड्यात मराठीची उपेक्षा करण्यात येत असून ती तातडीने थांबवण्यात यावी अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
sebi taken various steps to encourage the dematerialization of shares print
‘डिमॅट’ अनिवार्य करण्याचा विचार : सेबी
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
rte registration process starting from Tuesday January 14
आरटीई प्रवेशांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून, किती जागा उपलब्ध?
Revenue Minister Chandrashekhar Bawankule warned revenue officials
खबरदार! कामात कुचराई तर कारवाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणाला दिला इशारा?
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा

हेही वाचा : पुणे अपघात प्रकरण : उपहासात्मक संदेशांचे टी-शर्ट्स, कीचेन आदींची ई-कॉमर्स साईटवर विक्री

राज्याने जाहीर केलेल्या धोरणानुसार महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे माध्यम हे प्रामुख्याने आणि प्राधान्याने मराठी भाषाच असेल. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीसाठी मराठी हा विषय अनिवार्य असेल, अशी तरतूद आहे. त्याची जाणिव आराखडा तयार करणाऱ्या समितीने ठेवलेली नाही. शिक्षणतज्ज्ञांमधील मतभेदांचा विचार न करता राजभाषा मराठी याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल लक्षात घेऊन शालेय अभ्यासक्रमांत मराठी भाषेचे शिक्षण सक्तीचे असावे, अशा आशयाचा मजकूर देसाई यांनी लिहिलेल्या पत्रात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठीला सार्वभौमत्व मिळाले याचा अभिमान संबंधित शासकीय अधिकारी तसेच आराखडा समितीच्या तज्ज्ञांना नसावा ही गोष्ट अत्यंत खेदजनक आहे, असेही पत्रात नमीद करण्यात आले आहे.

Story img Loader