मुंबई : अहमदाबाद – मुंबई सेंट्रलदरम्यान नव्या २० डब्यांच्या वंदे भारत ट्रेनची वेग चाचणी शुक्रवारी (९ ऑगस्ट) घेण्यात आली. अहमदाबाद – मुंबई सेंट्रलदरम्यान ताशी १३० किमी वेगाची चाचणी यशस्वी झाली.

रिसर्च डिझाईन्स ॲण्ड स्टँडर्डस् ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) देखरेखीखाली घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये नवीन वंदे भारत ट्रेन शुक्रवारी सकाळी ७ वाजता अहमदाबादहून निघाली आणि दुपारी १२.२१ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचली. या ट्रेनने अहमदाबाद – मुंबईदरम्यानचे अंतर ५ तास २१ मिनिटांत पूर्ण केले. सध्या १६ डब्यांच्या वंदे भारत ट्रेनला अहमदाबाद – मुंबई सेंट्रलदरम्यान पार करण्यासाठी ५ तास २५ मिनिटे लागतात. वेगाची चाचणी यशस्वी झाली, मात्र अंतिम अहवाल अद्याप तयार झालेला नाही, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

हेही वाचा – झोपडीवासीयांचे भाडे थकवणारा विकासक काळ्या यादीत, गुन्हाही दाखल! प्राधिकरणाकडून प्रथमच कठोर कारवाई

हेही वाचा – मुंबई : म्हाडाची अल्प गटात महागडी घरे, वरळीतील सदनिका २.६२ कोटींची; मासिक उत्पन्नाची मर्यादा ७५ हजार रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या सेवेत असलेल्या १६ डब्यांच्या वंदे भारतमध्ये प्रवाशांची क्षमता १३५ ते १४० टक्के असते. नवीन २० डब्यांची वंदे भारत सुरू झाल्यास प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होईल. तसेच प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास आणि सर्वाधिक सुविधा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे.