मुंबई: गेली अनेक वर्षे धोकादायक स्थितीत उभी असलेली चुनाभट्टीमधील टाटानगर इमारत अखेर मुंबई महानगरपालिकेने जमीनदोस्त केली. मात्र या इमारतीत वास्तव्यास असलेले गिरणी कामगार आद्यपही वाऱ्यावरच आहेत. दरम्यान, सरकारने पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

चुनाभट्टीमधील स्वदेशी गिरणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १९६० मध्ये चुनाभट्टी परिसरात टाटानगर इमारत बांधण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी ही गिरणी बंद झाली. त्यानंतर कंपनीने या इमारतीकडे कानाडोळा केला. परिणामी, डागडुजीअभावी इमारतीची अवस्था दयनीय झाली. इमारतीच्या छताला दिलेला सिमेंटचा गिलावा अधूनमधून कोसळत असल्याने रहिवासी जीव मुठीत धरून इमारतीमध्ये राहत होते. मात्र गेल्या तीन – चार वर्षांत इमारत जरजर झाली. त्यामुळे काही रहिवाशांनी पदरमोड करून भाड्याच्या घरात राहणे पसंत केले.

cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
from former Chief Minister Prithviraj Chavan Question over responsible for the extortion cases in the state
राज्यातील खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे तर कोण जबाबदार ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा
minister gulabrao patil Devendra Fadnavis Aditya Thackeray jalgaon
देवेंद्र फडणवीस योग्य वेळी आदित्य ठाकरेंना शिक्षा देतील – गुलाबराव पाटील यांचा दावा
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान
some bad decisions happened on eknath shinde tenure as chief minister says forest minister ganesh naik
एकनाथ शिंदे यांच्या कालखंडात काही चुकीच्या गोष्टी घडल्या; वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
dhananjay munde
मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक; भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!

हेही वाचा… आता सेंट जॉर्ज रुग्णालयातही यकृत प्रत्यारोपण शक्य

गेल्या दोन वर्षापर्यंत या इमारतीत सहा ते सात कुटुंबे वास्तव्यास होती. मात्र दीड वर्षांपूर्वी कुर्ला येथील नेहरूनगर परिसरातील एक धोकादायक इमारत कोसळल्यानंतर भर पावसात महानगरपालिकेने टाटानगर इमारत पूर्णपणे रिकामी केली. त्यानंतर काही दिवस या कुटुंबियांना महानगरपालिकेने एका शाळेत आश्रय दिला होता. मात्र काही दिवसानंतर हे नागरिक पुन्हा या इमारतीत वास्तवास आले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने पुन्हा या सर्वांची घरे रिकामी करून इमारत तोडण्यास सुरुवात केली. या इमारतीमधील बहुसंख्य रहिवासी सध्या भाड्याच्या घरात अथवा नातेवाईकांकडे वास्तव्यास आहेत. दरम्यान, सरकारने आम्हाला याच परिसरात कायमस्वरूपी घर द्यावे किंवा भाडे द्यावे, अशी मागणी या गिरणी कामगारांकडून करण्यात येत आहे.

Story img Loader