राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरामच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपाला भरघोश यश मिळालं आहे. आता, मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा, असं आव्हान शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं आहे. तसेच, मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या ‘शिवालय’ कार्यालयाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

police booked gmchdean dr raj gajbhiye including 11 doctors for neglinace in woman surgery
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये यांच्यासह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा; प्रकरण काय? जाणून घ्या…
mira bhayandar, Navi Mumbai,
नवी मुंबई, मिराभाईंदरमध्ये नाराजी तर, ठाण्यात मात्र दिलजमाई
Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात

उद्धव ठाकरे म्हणाले, “राजस्थान, छत्तीगसड आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाला भरघोस यश मिळालं आहे. आता, मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा. एवढी तुमची लाट असेल, तर लोकसभेची एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. आमच्याही मनात काही शंका नको. सगळं वातावारण विरोधात आहे. एक्झिट पोल आणि उलटेपालटे करणारे निकाल लागत आहेत. मग, हे कसं घडलं? हा प्रश्न मतदारांना पडत असेल. ती शंका दूर करण्यासाठी एकच निवडणूक दम असेल, तर बॅलेट पेपरवर घ्या.”

हेही वाचा : “…तर निवडणुकीत देव-धर्माचे मुद्दे मांडल्यास तुम्ही आमच्यावर कारवाई करू शकत नाही”, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा

“बॅलेट पेपरची मतमोजणी करण्यासाठी वेळ लागतो. लोकशाही आणि देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीला मतमोजणीसाठी दोन-तीन दिवस लागले, तर काय फरक पडतो. महापालिका निवडणूक एक-दोन वर्ष झालं पुढं ढकलण्यात आली आहे. त्यात वेळ जात नाही का?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : “बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या”; राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाच्या नेत्याचं उत्तर, म्हणाले, “जनादेश…”

“तुमच्यात हिंमत आणि आत्मविश्वास असेल, तर लोकसभेची निवडणूक देशभर बॅलेट पेपरवर घेऊन जिंकून दाखवावी. नाही, तर मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा,” असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं आहे.