लोकसत्ता टीम
नागपूर: अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गातील ३४० पदे वाढवण्यात आली आहेत. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण ५०१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एमपीएससीकडून ११ मे २०२२ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ही जाहिरात केवळ १६१ पदभरतीची असल्याने परीक्षार्थीकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत होती. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातून विद्यार्थी शहरात येतात.
हेही वाचा… वर्धा: अवैध वाळूसाठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर; २०० ब्रास वाळूसाठा जप्त
विशेषत: पुण्यात स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला होता. तसाच तो ‘एमपीएससी’वरही झाला. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसत आहे.