बुलढाणा : लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्या तरी राज्य सरकार आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री शिंदे येथे आले होते. त्यांनी धाड नाका परिसरातील ओंकार लॉन्स येथे संध्याकाळी सहा वाजता पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित केले.

यानंतर बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे निवडक प्रसिद्धी माध्यमांशी अल्पसंवाद साधला. यावेळी ते म्हणाले, निवडणूका सुरू असल्या तरी मी रोज सकाळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून आपत्तीची माहिती घेतो.

BJP Retain Support uttam jankar, madha lok sabha seat, uttam jankar, dhairyasheel mohite patil, NCP sharad pawar group, devendra fadnavis, amit shah,
माढ्यात नुकसान नियंत्रणासाठी देवेंद्र फडणवीस सरसावले, नाराज उत्तम जानकरांना विशेष विमानाने मुंबईत पाचारण
Dr Amol Kolhe on Ajit Pawar karyasamrat
‘माझे काका अभिनय क्षेत्रात नव्हते’, नटसम्राट या टीकेवर अमोल कोल्हेंची अजित पवारांवर खोचक टीका
Sanjay Patil vs laxmi hebbalkar
“त्यांना एक पेग…”, भाजपाचे माजी आमदार संजय पाटील यांची महिला मंत्र्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

हेही वाचा…“इंडिया आघाडीचा ना झेंडा, ना अजेंडा,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका; म्हणाले…

कुठे गारपीट, कुठे अवकाळी पाऊस याची माहिती जाणून घेतो. यानंतर या अधिकाऱ्यांना पंचनामे, सर्वेक्षण व मदत करण्याचे निर्देश देतो. त्यामुळे निवडणुका असल्या तरी बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यावेळी दिली.