वर्धा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टॉप गियरवर आला आहे. बड्या नेत्यांची सभा लागत असल्याने उदासीन दिसणारा ग्रामीण भाग सहभागी होत भाषणाचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे. आर्वीत देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे विरुद्ध खासदार पत्नी मयूरा अमर काळे, असा सामना रंगात आला आहे. दोन्ही उमेदवार तोडीस तोड म्हणून चर्चा पण झडत आहेत. काही वाक्ये तर मतदार डायलॉग म्हणून वापरू लागले आहेत. आर्वीतील एका सभेत दादाराव केचे म्हणाले की, मी १९८२ पासून घराणेशाही विरोधात लढत आहे. स्वातंत्र्यास ७५ वर्ष, त्यापैकी ६५ वर्ष काँग्रेस व त्यातील ४० वर्षे आर्वीत काळे कुटुंब. मात्र इतक्या वर्षात आर्वीसाठी काय केले ते सांगत नाही आणि पुढे काय करणार हे पण विरोधी उमेदवार बोलत नाही, असा टोला त्यांनी अमर काळे यांना लगावला. सांगण्यासारखे एक काम दाखवावे, असेही आवाहन त्यांनी विरोधकांना दिले. आणि टाळ्यांचा गडगडाट झाला.

खासदार पत्नी रिंगणात असल्याने सुमित वानखेडे यांच्या अर्धांगिनी अँड. क्षितिजा काळे या पण प्रचारार्थ रिंगणात उतरल्या आहेत. मुंबईत प्रसिद्ध वकिली फर्म स्वबळावर नावारूपास आणणाऱ्या अँड. क्षितिजा यांनीही विरोधकांवार तोफ डागली. संविधानास धोका असल्याचा खोटा प्रचार करतात. पण आता खरा धोका कुटुंबाच्या सत्तेपुढे उभा झाला आहे. ४० वर्षात जी कामे झाली नाही ती आता चार वर्षात आर्वीत झाली. खरं नसेल तर खोडून काढा, असे आव्हान त्यांनी दिले. पुढे त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेता कसा असावा ते सांगून ठेवले आहे. नेता दूरदृष्टी, सामर्थ्य, धैर्य, करुणा असणारा असावा, असे डॉ. आंबेडकर म्हणत. हे सर्व गुण सुमित वानखेडे यांच्यात असल्याची पावती अँड. क्षितिजा वानखेडे यांनी दिली.

हेही वाचा…महाराष्ट्रातील ‘या’ विधानसभेत प्रचारासाठी सहा भाषांचा वापर, तीन राज्यांचा…

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुधीर दिवे म्हणाले की, काँग्रेवाल्यांचे दादाराव केचेंविषयी प्रेम आता जास्तच उफाळून आले आहे. त्यांची प्रशंसा ते सभेतून करीत आहेत. मात्र दादाराव यांचा सन्मान करण्यासाठी भाजप समर्थ आहे. येथे कुणीही तिकीट मागू शकतो आणि एकाला मिळाली की मग सर्व कामाला लागतात. नाराज नं होता कामाला लागणे ही भाजपची संस्कृती. एवढ्या वर्षांत काय केले ते सांगत नाही. आम्ही काय केले ते जनतेस दिसत आहे, अशी टिपणी दिवे यांनी केली.