लोकसत्ता टीम

नागपूर: शासनाच्या नव्या धोरणानुसार सरकारच वाळू उपलब्ध करून देणार, अशी घोषणा करण्यात आल्यानंतरही जिल्ह्यातून वाळूची अवैध वाहतूक सुरूच असल्याने शासनाच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागपूर जिल्ह्यात रामटेक पोलिसांनी परवाना नसताना वाळू नेणारा टिप्पर पकडला. अशीच कारवाई मौदा पोलिसांनीही केली आहे. त्यामुळे शासनाच्या नव्या धोरणानंतरही अवैध वाहतुकीवर पायबंद बसला नसल्याचे स्पष्ट होते. रामटेक -तुमसर मार्गावर विना परवाना वाळू नेणारा टिप्पर पोलिसांनी पकडला. या भागात वाळू चोरी सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली व टिप्पर जप्त केला.

आणखी वाचा-‘ओटीपी-पासवर्ड’ दिला नाही, तरी गमावले सव्‍वा लाख रुपये

सध्या नागपूरमध्ये मोठ्या संख्येत बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी लागणारी वाळू इतर जिल्ह्यातून किंवा इतर राज्यातून आणली जात आहे व शहरात चढ्या दरात ती विकली जात आहे. त्यामुळे शासनाच्या नव्या धोरणानुसार स्वस्त: दरात वाळू देण्याची घोषणा प्रत्यक्षात कृतीत उतरल्याचे सध्या तरी दिसून येत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष

नागपूर जिल्ह्यात वाळू घाटाचे लिलाव झाले नसतानाही इतर छुप्या पद्धतीने उत्खनन सुरू आहे. इतर राज्यातूनही चोरट्या मार्गाने किंवा बनावट परवाना तयार करून वाळू आणली जाते. राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळूचा काळाबाजार होऊ देणार नाही, असे स्पष्ट केल्यावरही हा प्रकार सर्रास सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले.