लोकसत्ता टीम

बुलढाणा : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या सोयाबिन, कपाशीला नगण्य भाव मिळत आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे. याचा विदर्भात सर्वाधिक लोकप्रतिनिधी असलेल्या भाजपला याचा मोठा फटका बसेल, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले.

आणखी वाचा-“ओजसची कामगिरी नागपूरचे नाव जगात उंचावणारी” जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना तुपकर म्हणाले, राज्यातील सोयाबीन कापूस शेतकरी आर्थिक अडचणीच्या चक्रव्युहात अडकला आहे. अपुऱ्या पावसामुळे उत्पादन घटणार आहे. मशागतीचा खर्च दुप्पट तर उत्पादन अत्यल्प राहणार आहे. तसेच भाव सुद्धा मिळणार नाही. यामुळे आज शेतकरी अडचणीतच नाही तर आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. सत्ताधाऱ्यांना मात्र याच्याशी काहीच घेणे देणे नाही. याचा फटका भाजपच नव्हे तर सत्ताधाऱ्यांनाही बसणार आहे. काल नाशिक जिल्ह्यात कांदा टोमॅटो उत्पादकांनी अजित पवारांचीच वाट अडवली. त्याचप्रमाणे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी या सत्ताधाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही.