लोकसत्ता टीम

नागपूर : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना आणि प्रचार शिगेला पोहचला असताना राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात आणि प्रामुख्याने विदर्भात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, येत्या २४ तासात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस हजेरी लावणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.

heavy rain with lightning damage kharif crops along with grapes in sangli
सांगलीत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; द्राक्षासोबत खरीप पिकांचे नुकसान
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Atal Setu Suicide
Atal Setu Suicide : अटल सेतूवरून उडी घेत ५२ वर्षीय व्यावसायिकाची आत्महत्या; तीन दिवसांत दुसरी घटना
Iran Israel Conflict
“बिन्यामिन नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर”, इराणच्या भारतीय राजदूतांची टीका; भारताकडे मागितली मदत!
gold price hike in during Navratri festival
ऐन नवरात्राच्या तोंडावर सोन्याच्या दरात बदल… आता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम…
villagers protested against daighar garbage project
ठाण्यात पुन्हा कचराकोंडीची चिन्हे; डायघर प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध, देयके मिळत नसल्याने ठेकेदाराने रोखल्या घंटागाड्या
gambler man dies after jumped from second floor of the building over police action fear svk 88 zws
पुणे: जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा पडताच दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी, उपचारादरम्यान मृत्यू
cyclonic air condition developed over North Maharashtra forming low pressure belt to North Bangladesh
पुण्यात बुधवारी पडलेल्या पावसाने २१ सप्टेंबर १९३८ रोजीचा विक्रम मोडला; जाणून घ्या, सप्टेंबर महिन्यांतील आजवरच्या पावसाची आकडेवारी

संपूर्ण आठवडा वादळीवारा आणि गारपिटीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर आठवड्याची अखेरसुद्धा मुसळधार पावसानेच होणार आहे. विदर्भात आज नागपूरसह अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा ‘अलर्ट’ दिला आहे. तर सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना सुद्धा ‘अलर्ट’ दिला आहे. गेल्या आठवड्याभरापासूनच कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. तर विदर्भातला शेतकरी संकटात सापडला आहे.

आणखी वाचा-“राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही,” अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसमध्ये…”

मराठवाड्यातील लातूर आणि परभणीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळीवारा आणि गारपिटीसह पाऊस झाल्याने शेतपिकांचे तसेच घरांचे नुकसान झाले. राज्यात लोकसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मात्र अवकाळी पावसामुळे त्रस्त झाले आहेत. प्रामुख्याने विदर्भात अवकाळीचे संकट कोसळले आहे. तर भारतीय हवामान खात्याने आठवड्याची अखेरही पावसानेच होणार असल्याचे सांगितले आहे. खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ घोषित केला आहे.