वर्धा, विविध नावीन्यपूर्ण उपक्रम ही महाराष्ट्राची देशात ओळख आहे. तसे अनुकरण देशभर झाले आहे. शैक्षणिक क्षेत्रात राज्य सरकारने विविध अनोखे कार्यक्रम राबविले असून त्यात आता नवा उपक्रम जोडल्या जाणार. आयडॉल शिक्षक व शिक्षण संस्था बँक स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. ही बँक नेमकी कश्यासाठी ? असा प्रश्न येतो. शालेय शिक्षण विभागाने त्याचा तपशील प्रसिद्ध केला आहे. प्रत्येक मुलास दर्जेदार शिक्षण देण्यासाठी उपक्रम अंमलात येतात. खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा हे उपक्रम राबवितात. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास आयुष्य वेचणारे शिक्षक आहेत.त्यांच्या अनुभवाचा लाभ राज्यातील अन्य विद्यार्थी, शिक्षक, शाळा, पालक यांना पण झाला पाहिजे. गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. अश्या शिक्षकांच्या कामाचा गौरव करण्याचा हेतू आहे.
नव्या आव्हानानुसार राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. त्यामुळे शैक्षणिक प्रगतीस हातभार लागतो. राज्यातील सृजनशील, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, खेळ नैपूण्य आदीत शाळा व शैक्षणिक संस्था यांचे भरीव योगदान आहे. त्यांचा गौरव व्हावा ही जनतेची ईच्छा.
असा तपशील देत शासनाने आयडॉल शिक्षक, शाळा व संस्था बँक पुरुस्कृत केली आहे.ती तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर स्थापन होणार. त्यासाठी जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या घटकंची निवड करतांना यू डायस, सरल, मित्रा, दिशा, शाळा भेटी, निरीक्षण याचा आधार घेण्याची सूचना आहे. तसेच निवड करतांना अध्ययनात नवी पद्धत, शासकीय धोरण अंमल, मुख्यमंत्री माझी शाळा, जनता सहभाग, विद्यार्थ्यांची कला, क्रीडा व अन्य प्रगती, वाढलेली पटसंख्या, दैनिक उपस्थिती, शिक्षकांचे आचार विचार व अन्य बाबींचा विचार करण्याची सूचना आहे.
पण शिक्षक, संस्था व शाळा यांच्याकडून कोणतेही अर्ज,कागदपत्रे घेऊ नये व सादरीकरण होवू नये. नमूद मुद्द्याचा विचार करूनच निवड केल्या जाण्याचा दंडक घालण्यात आला आहे. १०० गुणांपैकी प्राप्त गुणाच्या आधारे आयडॉल शिक्षकांची निवड करण्याची सूचना आहे. गुण बहाल करण्यासाठी पण विविध निकष ठेवण्यात आले आहेत.त्यात इयत्ता निहाय कामगिरी, शिक्षक आरोग्य, शिक्षकांमुळे वाढता विद्यार्थी सहभाग, वाचन प्रेरणा, शालेय स्वच्छता व वृक्ष लागवड सहभाग, पालकांमध्ये जागृती व अन्य निकष आहेत.