चंद्रपूर : तांत्रिक बिघाडामुळे महाऔष्णिक वीज केंद्रातील ५०० मेगावॉटचा संच क्रमांक ५ पुन्हा एकदा बंद पडला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्ष दीड वर्षापासून हा संच सातत्याने बंद पडत आहे. भेलचे अभियंते हा संच दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात विजेची मागणी वाढली असताना चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील ५०० मेगावॉटच्या संच क्रमांक ५ ला तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागले आहे. हा संच गेल्या सहा महिन्यांपासून बंद होता. काही महिन्यांपूर्वीच हा संच पुर्ववत सुरू झाला. मात्र दोन दिवसापूर्वी टरबाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा संच बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा : उपनिबंधक वैशाली मिटकरी यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना अटक

The central government has not given new permission for onion export but the open export of onion from the country is closed
कांद्याची खुली निर्यात बंदच, केंद्राचे आकडे गेल्या वर्षभरातील
gadchiroli lok sabha , sironcha polling station, evm technical glitch, new evm machine, aheri, helicopter, lok sabha 2024, election 2024, polling station, polling day, gadchiroli news, gadchiroli polling news,
ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, सिरोंचातील मतदान केंद्रावर गोंधळ; अहेरीवरून हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात…
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी

५०० मेगावॉटचा संच बंद झाल्यामुळे वीज उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. हा संच दुरुस्तीसाठी भेल कंपनीचे अभियंता येथे दाखल झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून संच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र तरीही संच सुरू होण्यास किमान १५ ते २० दिवसांचा कालावधी लागेल असे सांगण्यात येत आहे.