नागपूर : कोळशावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचा नागपूर शहर व परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केल्याशिवाय वीज प्रकल्पाचा विस्तार करू नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटने (सीएसई) नुकत्याच केलेल्या अभ्यासात दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील वायुप्रदूषण वाढविण्यात कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प कारणीभूत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तेथील ११ औष्णिक वीज प्रकल्पपैकी सध्या दोन वीज प्रकल्पामध्ये सल्फरडाय ऑक्साईड नियंत्रणासाठी उपाययोजना केली आहे. मात्र, नागपूरमध्ये औष्णिक वीज विस्ताराच्या तयारीत असताना विद्यमान ऊर्जा प्रकल्प आवश्यक सल्फरडाय ऑक्साइड नियंत्रण उपायांशिवाय कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : लग्न करणे सोपे मात्र विवाह प्रमाणपत्र मिळवणे कठीण; काय आहे वाचा…

electricity cost hike
वीजदरवाढ तूर्तास टळली, ‘डीसल्फरायझेशन’ची सक्ती दोन वर्षे लांबणीवर गेल्याने दिलासा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Uran gas power plant is producing 300 MW of electricity instead of 672 MW
वायू पुरवठ्याविना वीज प्रकल्प ‘गॅसवर’ उरण वीज प्रकल्पातील उत्पादन निम्म्यावर
Why is desulfurization mandatory to reduce air pollution in thermal power plants and how much will it increase electricity prices
विश्लेषण: ‘डीसल्फरायझेशन’ हवे की वीज दरवाढ… की प्रदूषण?
Chandrapur air pollution annual statistics year 2024
चंद्रपुरातील प्रदुषणात घट; काय सांगते वार्षिक आकडेवारी? जाणून घ्या…
Work on direct water pipeline from Gangapur Dam begins
गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीचे काम प्रारंभ, नाशिकचा तीन दशकांचा प्रश्न मार्गी लागणार
average air quality index in uran has remained at the level of 150 to 200
उरणच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक वर्षभर १५० पार
electricity price increase by 40 paise per unit
वीजदरवाढीची टांगती तलवार, प्रतियुनिट ४० पैसे वाढण्याची भीती; केंद्र सरकारकडून मार्ग काढण्याचा प्रयत्न

हेही वाचा : “ही तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना”, रामटेकच्या घटनेवर प्रतिक्रिया

फ्लू गॅस डिसल्फ्युरायझेशन (एफजीडी) हे ऊर्जा संयंत्राद्वारे उत्सर्जित होणाऱ्या वायूंमधून सल्फरडाय ऑक्साइड काढून टाकण्यासाठी विकसित केलेले तंत्रज्ञान आहे. २०११ च्या राज्य शासन निर्णयानुसार ऊर्जा प्रकल्पामध्ये एफजीडी तंत्रज्ञान बसविणे अनिवार्य आहे. परंतु, याबाबत कोणत्याही उपाययोजनांचे पालन न करता नागपुरातील वीज प्रकल्प दशकाहून अधिक काळ कार्यरत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचे गांभीर्य लक्षात घेता कोळशावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्प हवेच्या गुणवत्तेवर काय परिणाम करतो, याबाबत विश्लेषण करण्यासाठी सीएसई अभ्यासाप्रमाणेच नागपुरात सर्वसमावेशक अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. जोपर्यंत असा अभ्यास आणि योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत नागपुरात सुरू असलेल्या औष्णिक वीज प्रकल्पाचा विस्तार थांबविण्याचा सल्ला मुत्तेमवार यांनी दिला आहे. सार्वजनिक आरोग्याशी तडजोड करणा-या कोणत्याही विकासाचे परिणाम गंभीरच होतील, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Story img Loader