नागपूर : ‘सेट तयार झाला का, अमूक कुठे आहे?’, अशा प्रश्नांची विचारणा, त्या अनुषंगाने सुरू असलेली लगबग, उत्साह आणि धाकधूकही, परीक्षक आणि स्पर्धेबद्दलची उत्सुकता, जिंकण्याची ईर्षा पण तितकाच खिलाडूपणा आणि प्रतिस्पर्धी संघालाही मदत करण्याची तयारी… अशा वातावरणात, तरुणाईच्या जल्लोषात सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारती विद्यापीठ, पुणे आणि शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचालित विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग ॲण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची बुधवारी सुरुवात झाली. विषयांतील वैविध्य आणि आविष्कारातील नाविन्य हे या स्पर्धेचे अनोखे वैशिष्ट्य ठरले.

हेही वाचा : लग्न करणे सोपे मात्र विवाह प्रमाणपत्र मिळवणे कठीण; काय आहे वाचा…

Revised schedule, admissions ,
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे सुधारित वेळापत्रक जाहीर
Final hearing, Maratha reservation,
मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी ५ ऑगस्टपासून सुरू
11th Central Admission Process, Second Final Merit List for 11th Central Admission , second list of 11th second Pune, pimpri chichwad, pimpri chichwad municipal corporation , pimpri chichwad municipal corporation jurisdiction, pune news,
अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश?
BA BSc Bed Law 5 year courses admissions open Mumbai
बीए/बीएस्सी बीएड, विधि पाच वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना सुरुवात
Tinu Singh of Bihar created a new history by getting five government jobs simultaneously in 5 days
बिहारची ‘अफसर बिटिया’
Maharashtra's Financial Health Strong, Maharashtra's Financial Health, Maharashtra s Financial Health Strong Despite Debt, Former Minister Sanjay Kute, buldhana
राज्यावर ५२ हजार कोटींचे कर्ज, मात्र आर्थिक स्थिती उत्तम; माजी मंत्री संजय कुटे म्हणतात, ‘लाडकी बहीणच्या अंमलबजावणीत…’
scholarship exam result announced marathi news
पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर…यंदा किती विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती?
Who is Anjali Birla
IAS अंजली बिर्ला! लोकसभा अध्यक्षांच्या लेकीचं पहिल्याच टप्प्यातील यश का ठरतंय वादग्रस्त? चर्चेमागील सत्य जाणून घ्या!

फेरीच्या पहिल्या दिवशी दर्जदार एकांकिका मोठ्या उत्साहात सादर करण्यात आल्या. सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनीच लिहिलेल्या संहिता हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. ‘सुख विकणारा माणूस’ या नाटकाने शेतकरी कुटूंबातील महिलेवर होणारा अत्याचार, घरातील अठराविश्व दारिद्र, मुलीचे लग्न या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले तर दोन भावांमधील वाद, दुभंग व्यक्तिमत्त्व यासारख्या विषयांची मांडणी एकांकिकांमधून करण्यात आली. यावेळी तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या मित्रांच्या एकांकिका पाहायला आले होते. यावेळी तरुणाईच्या टाळ्या, हिप हिप हुर्रे… अशा जल्लोषात सभागृह दुमदुमले होते.