लोकसत्ता टीम
वर्धा : रक्षाबंधन साठी पत्नी माहेरी गेली. तिला आणायला स्वतःच्या दुचाकीने निघाला. पण पुराने घात केला. समुद्रपूर तालुक्यातील विखणी येथे ही घटना घडली. हिंगणा रहिवासी गणेश मसराम हे विखणी येथे रुपाजी आडे यांच्याकडे येण्यास निघाले होते.
त्याचवेळी गावाकडील नदीला पूर आला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी पूर आलेल्या नाल्यावरील पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा लोंढा आला अन् त्यात ते गाडीसह वाहून गेले. दुचाकी नाल्यात अडकून पडली होती. ती दिसल्याने गणेश मसराम हे वाहून गेल्याचा कयास गावकऱ्यांनी लावला. शोधाशोध सुरू झाली.
आणखी वाचा- पश्चिम विदर्भात आठ महिन्यांत ७३७ शेतकरी आत्महत्या
तेव्हा पाचशे मिटर अंतरावर मृतदेह आढळून आला. माहिती मिळाल्यावर नायब तहसीलदार राजेंद्र सयाम तसेच अन्य घटनास्थळी पोहचले. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह व दुचाकी बाहेर काढण्यात आली.अधिक तपास सुरू आहे.