नागपूर : ‘महायुतीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून तुम्ही उभे राहा,’ असे मला सांगण्यात आले. त्यामुळे मी निवडणूक लढण्यासाठी तयार झालो. आता कोणाला काय वाटते, याचा विचार मी करत नाही. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा खासदार असल्याने त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो कसा सोडवायचा हे महायुतीने ठरवावे. मात्र मी तयार आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नागपुरात दिली.

sadhguru jaggi vasudev isha foundation
“आम्ही कुणालाही लग्न करायला वा संन्यासी व्हायला सांगत नाही”, जग्गी वासुदेव यांच्या ‘इशा फाऊंडेशन’चं ‘त्या’ आरोपांवर स्पष्टीकरण!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Devendra Fadnavis on nitin gadkari
“अनुदानाची शाश्वती नाही, लाडकी बहीणसाठी पैसे द्यावे लागतात”, नितीन गडकरींच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!
tanishq
नैसर्गिक हिऱ्यांना कृत्रिम पर्याय नाही; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायणन यांची माहिती
yuvasena s dipesh mhatre
कडोंमपाच्या नाममुद्रेचा दिपेश म्हात्रेंनी गैरवापर केल्याची भाजपची आयुक्त डॉ. जाखड यांच्याकडे तक्रार; कायदेशीर कारवाईची मागणी
sebi fined rs 650 crore to 22 companies including anil ambani part 2
अबब भयंकर शिक्षा ! (भाग २)
Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…

नाशिकमध्ये १९ लाख मतदार आहेत, त्यात मराठा समाजाचे साडेपाच ते पावणेसहा लाख मतदार आहेत. मराठा समाजाचे मत मला मिळतील. सगळेच मराठा मतदार माझ्याविरुद्ध बोलतात, असे नाही. मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या, अशी मागणी होती आणि आम्ही ते दिले आहे. त्यामुळे आता हा मुद्दा नाही, असेही भुजबळ म्हणाले.

हेही वाचा >>> बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन

गेल्या २४ तारखेला मला सांगण्यात आले आणि मी तयारी सुरू केली. आता महायुतीने जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा, पण मतदानाच्या आधी घ्यावा. मला उमेदवारी मिळाल्याने राज्यात महायुतीला ओबीसी मतांचा लाभ होईल का, हे जाणकारांनीच ठरवावे. आम्ही ओबीसींच्या समाजकारणाचा विचार करत आलो आणि त्याला राजकारणाची जोड असायला हवी. पण मराठा राजकारणात आल्यानंतर निवडून येऊ शकत नाही, असे माझे आव्हान आहे. मराठा समाज महाराष्ट्रात आहे. ही देशाची निवडणूक आहे. मोदींना निवडून द्यायचे आहे. दिल्लीतील नेत्यांना मी हवाहवासा वाटतो का, याचे मला ज्ञान नाही. पण, दिल्ली माझ्यासाठी काही नवीन नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले. भूक ही मनुष्याची पहिली गरज आहे. यामुळे सरकार त्यांना मोफत रेशन देत आहे आणि हे देत असताना शेतकऱ्यांना एमएसपी द्यावेच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.