नागपूर : रेल्वे प्रवाशांनी चूक केल्यास दंड भरून द्यावा लागतो तर रेल्वे प्रशासनाच्या चुकीने प्रवाशांना घडलेल्या मनस्तापाचे काय? असा सवाल केला जात आहे.

मंगळवारी रात्री टिटवाळाजवळ मुंबई-दुरान्तो एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. यामुळे नागपूरला ही गाडी उशिरा पोहोचली. त्यानंतर देखभाल दुरुस्तीसाठी वेळ लागतो. त्यामुळे ही गाडी नागपूरहून मुंबईसाठी बुधवारी चार तास विलंबाने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, प्रवाशांना तसे कळवण्यात आले नाही. यामुळे प्रवाशांना नाहक रेल्वे स्थानकावर चार तास खोळंबून राहावे लागले.

हेही वाचा – काँग्रेस नाही आपणच लढू, वर्धा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी तर्फे हर्षवर्धन देशमुख, सुबोध मोहिते, समीर देशमुख इच्छुक

नागपूर-मुंबई दुरान्तो एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिराने नागपुरातून सोडण्यात येईल, असा संदेश न मिळाल्याने प्रवासी बुधवारी रात्री साडेबारा वाजेपर्यंत नागपूर स्थानकावर ताटकळत होते. रेल्वे प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला. १२२९० नागपूर-सीएसटीएम दुरान्तो एक्सप्रेस नागपूर स्थानकावरून नियोजित वेळी रात्री ८ वाजून ४० मिनटांनी सुटायला हवी होती. परंतु ही गाडी रात्री १२.४० वाजता सुटणार असल्याचे प्रवाशांना स्थानकावर पोहोचल्यावर कळले.

हेही वाचा – ‘बिपरजॉय’ गुजरातच्या किनारपट्टीपासून अवघ्या २०० किलोमीटर अंतरावर, ‘एवढा’ राहणार वाऱ्याचा वेग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याबाबत प्रशासनाला विचारणा करण्याचा प्रयत्न काही प्रवाशांनी केला असता, मुंबईहून दुरान्तो विलंबाने आल्याने नागपूरहून ही गाडी उशिरा सुटत असल्याचे उत्तर देण्यात आले. यासंदर्भातील संदेश प्रवाशांना का देण्यात आला नाही, याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. प्रवासी रात्री ८ वाजतापासून नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर पोहोचले होते. परंतु गाडी फलाटावर आली नाही. रेल्वे प्रशासनाने गाडीच्या सुटण्याच्या वेळेत झालेल्या बदलाविषयी प्रवाशांना लघुसंदेशाद्वारे कळवणे गरजेचे होते.