लोकसत्ता टीम

नागपूर : महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचे वातावरण तयार झाले असून एकंदरीतच राज्यातून १० ते ११ ऑक्टोबरदरम्यान मान्सूस परतण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज दिवसभरात पालघर, ठाणे, रायगड तसेच मध्य महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक तसेच विदर्भ व मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात या भागातून मान्सून परतण्याची चिन्हे आहेत. मात्र, दक्षिण कोकणच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस आद्रर्ता तयार होऊन पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे या भागातून पुढील पाच ते सहा दिवसात मान्सून परतेल.

Gold prices fell further but rise in the price of silver
सोन्याचे दर आणखी घसरले, मात्र चांदीच्या दरात वाढ, हे आहेत आजचे दर..
st bus, flood water, driver suspended, video viral,
VIDEO : पुराच्या पाण्यातून एसटी घातली, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चालकाचे निलंबन
crane, contractor, highway construction work,
सातारा : महामार्ग सुसज्जीकरण कामावरील ठेकेदाराची क्रेन जाळण्याचा प्रयत्न, संतप्त कराडकरांचा पाणीप्रश्नी उद्रेक
ujani dam, rain, Pune district,
सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पुढील महिनाभराच्या पावसावर उजनीचे भवितव्य
Kalyan, signal malfunction, Central Railway, service disruption, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Kasara, Karjat, local trains, commuter chaos, railway stations, passengers, Dombivli, rain, road traffic, transportation, thane news, marathi news, kalyan news, Central railway news, loksatta news,
कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत, कामाच्या पहिल्याच दिवशी लोकलचा गोंधळ असल्याने प्रवासी संतप्त
tigers died in mp graph of tiger deaths increasing in madhya pradesh
मध्यप्रदेशात वाढतो आहे, वाघांच्या मृत्यूचा आकडा, हा रेल्वे ट्रॅक …
anger among citizens over power outage in amrutdham area of panchavati zws 70
अमृतधाम परिसर विजेच्या लपंडावामुळे त्रस्त – रोजच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये रोष
Monsoon rains throughout the country Flood situation in Assam
मोसमी पाऊस संपूर्ण देशात, आसाममध्ये पूरस्थिती; गुजरातच्या अनेक गावांचा संपर्क तुटला

मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असून येत्या दोन-तीन दिवसात राज्याचा दक्षिण मध्य भाग वगळता अन्य भागातूनही मान्सून परतेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणातून मान्सून येत्या १० ऑक्टोबरपासून परतण्याची शक्यता आहे. मान्सून परतीचा प्रवास राजस्थानमधून साधारण १७ सप्टेंबरदरम्यान सुरु होत असतो. यावर्षी आठवडाभर उशिरा तो सुरू झाला आहे.

आणखी वाचा-गोंदिया : आदिशक्तीच्या मूर्तीलाही महागाईची झळ, श्रृंगार साहित्यांच्या दरात वाढ

आतापर्यंत संपूर्ण राजस्थान, हरियाणा, पंजाब तसेच जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश्, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छ भागातून मान्सून परतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हा प्रवास आणखी वेगात होईल. मान्सूनच्या परतीची रेषा सध्या गुरुग्राम, धर्मशाला, इंदौर, बडोदा व पोरबंदर अशी तयार झाली आहे. देशातील विविध राज्यांमधून पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरीही परतीच्या वाटेवर निघालेला हा मोसमी पाहुणा जाताजातासुद्धा धुमाकूळ घालणार आहे. सध्या देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या या बदलत्या हवामानाची चिन्हं पाहायला मिळत आहेत.