लोकसत्ता टीम

वर्धा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांनी आठवण निवडणूक काळात हमखास होत असल्याचे नवे नाही. दिल्लीचे आपचे खासदार संजयसिंग हे वर्धा दौऱ्यावर आज आले तेव्हा त्यांनीही शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला.

shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Ajit Pawar News
Ajit Pawar : अजित पवारांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना झापलं, “तुम्हाला इथे काय…”
Bajaj Finance officials beaten up by borrowers in Kanchengaon in Dombivli
डोंबिवलीतील कांचनगावमध्ये बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांना कर्जदारांकडून मारहाण
ubt chief uddhav thackeray slam maharashtra government over badlapur incident
विरोधकांचे आंदोलन; भाजपचा जागर; आरोपीला पाठीशी घालण्याचे काम – ठाकरे
Yavatmal, Eknath Shinde, Ladki Bahin Yojana, Eknath Shinde Defends Ladki Bahin Yojana, Eknath Shinde criticises opposition, eknath shinde in yavatmal, opposition criticism, w
योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा….मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन
Congress National Spokesperson Supriya Srineet demanded that Eknath Shinde and Devendra Fadnavis resign
शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी
Nashik, Congress, Nana Patole, Nana Patole Criticizes Maharashtra Government, Maharashtra government, Badlapur case, house arrest
भावना व्यक्त करणाऱ्यांना नजरकैद, नाना पटोले यांची महायुती सरकारवर टीका

ते म्हणाले की, शिवाजी महाराज यांनी दिलेली एक शिकवण महाराष्ट्रातील जनतेस नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘गद्दारोको माफी नाही’, हा शिवाजी महाराजांचा संदेश आहे. घड्याळ चोरणाऱ्या, धनुष्यबाण चोरणाऱ्या गद्दारांना माफ करू नका. त्यांना धडा शिकवा. त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन संजयसिंग यांनी केले. भाजपला निरोप देण्याची वेळ आली आहे. ते भुलथापा देणारी नारेबाजी करतात. त्याकडे दुर्लक्ष करा. मोदी की गॅरंटी म्हणतात ती गॅरंटी म्हणजे खोटे बोलण्याची गॅरंटी होय. बदल केला नाही तर ही निवडणूक कदाचित देशाची शेवटची निवडणूक ठरणार. संविधान बदलणार, आरक्षण संपणार, रोजगार राहणार नाही. हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल होणार. म्हणून या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा.

आणखी वाचा-तृतीतपंथयांची मते २४ तासात ३२ वरून २८ वर, उमेदवाराला दिलेल्या आकडेवारीत तफावत

वर्ध्यातून आघाडीने अमर काळे हा चांगला उमेदवार दिला आहे त्यास विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच इव्हीएम मतदानबाबत शंका व्यक्त करणारी विविध उदाहरणे पुढे आली आहे. ही बाब सर्वोच्च न्यायालयापुढे आहे. पण व्हीव्हीपॅट मधून निघणाऱ्या चिठ्यांची मोजदाद योग्य प्रकारे व्हावी, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. आघाडीचे जिल्हा निमंत्रक अविनाश काकडे, डॉ. शिरीष गोडे, आपचे मंगेश शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.