नागपूर: व्हाट्सअप ग्रुप हे दैनदिन कामकाजासाठी संपर्काचे माध्यम म्हणून सर्वपरिचीत आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये तो आहे. साहेबांच्या सूचना कार्यालयीन कामकाजासंदर्भातील आदेश, कर्मचा-यांकडून देण्यात येणारी माहिती असे सर्वसाधारण स्वरूप या व्हाट्सअप ग्रुपचे असते. याचे अॅडमीन संबधित विभागाचा अधिकारी असतो. तोटा कर्मचा-यांना त्यांच्या दैनंदिन कामांबाबत आदेश देतो. कर्मचारी त्या आदेशाचे पालन करतात. असाच एक ग्रुप नागपूरमध्ये कृषी खात्याचा आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना सॉईल हेल्थ असे या ग्रुपचे नाव आहे.

त्यावर असणा-या कृषी सहाय्यक सदस्यांनी मंगळवारी सकाळी अचानकपणे सरकारच्या अधिकृत व्हाट्सअप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याचे कारण होते कृषी सहाय्यकांचे आंदोलन. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या ग्रुपवर मंगळवारी सकाळी एकापाठोपाठ एक कृषी सहाय्यकांच्या ग्रुपमधून बाहेर पडण्याच्या संदेशाची गर्दी झाली.

“महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने कृषी सहाय्यक संवर्गाच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन पुकारले असून त्या आंदोलनाचा दुसरा टप्पा हा कार्यालयीन व्हाट्सअप ग्रुप मधून बाहेर पडण्याचा आहे. मी कृषी सहायक संघटनेचा सभासद असल्याने संघटनेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आज हा कार्यालयीन ग्रुप सोडत आहे.असे संदेशात नमूद करण्यात आले होते. सकाळी११:१५ ते ११: ४२ या पंचवीस मिनिटात ९ कृषी सहाय्यक ग्रुपमधून बाहेर पडले. काहींनी वरचा संदेश पुन्हा ग्रुपवर टाकला तर काहींनी त्यला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे सरकारच्या योजनेच्या अंमलबजावणी वर परिणाम होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध प्रलंबित मागण्यांची आश्‍वासनानंतरही शासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने एक मे पासून आंदोलन पुकारले आहे. यावर अद्यापही निर्णय झाला नसल्याने आजपासून (ता. ६) तीव्र आंदोलन सुरू केले. तसेच, सर्वच शासकीय ग्रुपमधून बाहेर पडणार असल्याचे संघटनेद्वारे कळविण्यात आले आहे.कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली १० फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत १५ दिवसांत मागण्यांबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आजतागायत कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आंदोलन कृषी सहायकांनी टप्प्याटप्प्याने तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.