निवडणूक आली की हा आमच्या जातीच्या किंवा तो आमच्या धर्माचा म्हणून उमेदवारी मागितली जाते. निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी मोठ-मोठे फलक लावले जातात मात्र त्याने निवडणूक जिंकता येत नाही. निवडणुकीच्या काळात कुठलीही अमिष दाखविण्यापेक्षा माणसांच्या मनात विश्वास आणि प्रेम निर्माण करा असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने दहावी आणि बारावीतील गुणवत्ता विद्यार्थ्याच्या सत्कार कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

हेही वाचा >>> बुलढाणा: मुसळधार पावसाचा तडाखा, अतिउच्चदाब वाहिनीचा मनोरा जमिनदोस्त; ४८ गावांचा वीज पुरवठा खंडित, तेरा हजार ग्राहकांना फटका

MPSC Verdict on confusion in Clerk Typist exam Nagpur
एमपीएससी: लिपिक-टंकलेखक परीक्षेतील गोंधळाबाबत मोठा निर्णय; ‘या’ उमेदवारांना कारवाईचा इशारा
Devendra Fadnavis
महायुतीत पुढील मुख्यमंत्री कोण असेल? फडणवीस स्पष्ट म्हणाले, “ज्या पक्षाच्या जास्त जागा…”
Mumbai, k c College, Renting Hall for BJP Event, k c College Renting Hall for BJP Event, k c College Criticized,
के.सी. महाविद्यालयाचे सभागृह भाजपच्या कार्यक्रमासाठी दिल्याने वाद, युवा सेनेकडून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे तक्रार
Uddhav thackerayee
“….म्हणून मला किंमत आहे”, उद्धव ठाकरेंचं विधान चर्चेत; म्हणाले, “नुसत्या उद्धवला…”
Ajit Pawar, udayanraje bhosale,
साताऱ्याच्या विकासाचं माझ्यावर सोडा, तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून द्या : अजित पवार
nagpur matin bhosale marathi news, nagpur fasepardhi marathi news
फासेपारधींच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या मतिन भोसलेंचा सन्मान, राष्ट्रसंत शिक्षण सेवा पुरस्काराने गौरव
Do Anjali Damania and Suhas Kande have the right to challenge the acquittal Chhagan Bhujbals question in HC
महाराष्ट्र सदन प्रकरण : दोषमुक्तीला आव्हान देण्याचा अधिकार दमानिया, कांदे यांना आहे का? उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान भुजबळ यांच्याकडून प्रश्न उपस्थित
satara lok sabha seat, Potential Arrest of NCP Candidate Shashikant Shinde, sharad pawar NCP s Candidate Shashikant Shinde , Mumbai apmc fraud case, Mumbai Agricultural Produce Market Committee, sharad pawar back Shashikant Shinde, marathi news,
शशिकांत शिंदेंना अटक होणार असल्याच्या चर्चेने गरमा-गरमी

शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी म्हणाले. माणसांच्या गुणवत्तेचा संबंध त्यांच्या जाती किंवा कुठल्याही पंथाशी नाही तर त्याच्या गुणवत्तेशी असतो. त्यामुळे निवडणूक आली की हा माझ्या धर्माचा किंवा जातीचा असा विचार करण्यापेक्षा लोकांचे प्रेम आणि विश्वास निर्माण केले पाहिजे. कुठल्याही समाजाचा नेता हा त्या समाजाचा संपूर्ण विकास करत नाही. निवडणुकीच्या काळात मोठे प्रचारासाठी मोठे फलक लावत असतो मात्र प्रचाराचे फलक लावत किंवा सावजी मटनच्या पाटर्या देऊन कुठलीही निवडणूक जिंकता येत नाही. आता लोक शहाणे झाले आहे. पार्टी करुन घेतात आणि मत दुसऱ्यांना देतात. त्यामुळे लोकांचा विश्वास व प्रेम निर्माण कराहे. आम्ही सर्व एक परिवार असून सर्व मिळून समाजाचे हित कशात आहे यावर काम करण्याची गरज आहे. मानवतेच्या आधारावर शिक्षकांनी काम केले पाहिजे असे आवाहन गडकरी यांनी केले.