नागपूर: नागपूर येथील कोट्यवधी मानवतावादी जनतेचे प्रेरणास्थान असलेल्या “दीक्षाभूमी” येथे बाह्य शक्तींचा बौद्ध धम्माची जागतिक वास्तू असलेल्या स्थळावर सतत हस्तक्षेप सुरू असतो. या विरोधात अनेकदा नागपुरातील व महाराष्ट्रातील जनतेने आपली नाराजी व्यक्त केलेली असून त्याचा “परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती” वर काडीमात्र फरक दिसत नाही व ते सुद्धा सत्ताधारी लोकांचे बाहुले असल्याचा आरोप होत आहे.

दीक्षाभूमीचे रखडलेले बांधकाम, दीक्षाभूमीतील जागेचा आर्थिक मिळकती करीता सुरू असलेला वापर, सामाजिक व धम्म सोहळ्यांन करिता परवानगी न देणे, स्मारक समिती अंतर्गत असलेल्या कॉलेजचे ब्राह्मणीकरण, आर्थिक गैरव्यवहार, मागासवर्गीय विद्यार्थी व शिक्षकांची अवहेलना होणे व इतर ही बाबींमध्ये काही ठराविक विचारधारेच्या लोकांचा सतत हुकूमशाही कारभार सुरू असतो. इथे बौद्धांनांच स्वातंत्र निर्णय घेण्याचा व वागण्याचा अधिकार नसल्याचे आक्षेप नोंदविले तसेच समानतेचे, बुद्ध व आंबेडकरवादी विचारांचे विरोधक असणारे दीक्षाभूमी मध्ये आपली सर्रास अरेरावी चालत असल्याचे नमूद आंदोलकांनी केले व संपूर्ण आंबेडकरवादी लोकांनी या आर.एस.एस धार्जीनी, मनुवादी पिलावळींचा पवित्र दीक्षाभूमी मधून बंदोबस्त करावा या करीता मोठया संख्येने जनआंदोलन उभारावे असे आवाहन केले.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Prakash Ambedkar Vijay Wadettiwar
“आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट, त्यामुळे तुम्ही वंचितच्या…”, प्रकाश आंबेडकरांचा विजय वडेट्टीवारांना इशारा
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी

हेही वाचा… विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू, वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी…

सोबत स्मारक समितीचा सुद्धा निषेध दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर कॉलेज समोर संवैधानिक मार्गाने नारे-निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी युवा शहर अध्यक्ष प्रसन्ना दुरगकर, युवा जिल्हा अध्यक्ष मनीष बोरकर, रविबाबु शेंडे, संगीता गोधनकर, प्रतिमा शेंडे, विवेक वानखेडे, सुमेध गोंडाणे, प्रफुल्ल माणके, विवेक हाडके, यशवंत चव्हाण, संजय सूर्यवंशी, अनुमीत तिरपुडे, अंकुश मोहिले, विजय गोंडुळे, अमोल डोंगरवार, अभिजित पडगम, धम्मदिप लोखंडे, राहूल भिमटे व अनेक कार्यकर्ता उपस्थीत होते.