गाडी अनेक तास उभी, रेल्वेकडून वेळेत मदत नाही
नागपूर : नागपूरहून गोंदियाकडे निघालेल्या गीतांजली एक्सप्रेसचे इंजिन कळमना जवळ अचानक नादुरुस्त झाले. त्यामुळे ही गाडी येथे काही तास थांबवून ठेवण्यात आली. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा : वाशीम : शिंदे गट भाजपच्या वाटेवर?; ‘त्या’ फलकांवरील छायाचित्रांवरून जोरदार चर्चा
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नागपूर रेल्वे स्थानकावरून सोमवारी सायंकाळी सव्वा सातच्या दरम्यान गीतांजली एक्सप्रेस गोंदियाच्या दिशेने निघाली, परंतु कळमना जवळ असताना या गाडीचे इंजिन अचानक नादुरुस्त झाले आणि ही गाडी तिथेच थांबली. परिणामी, इतर गाड्यांना लूप लाईन वरून वळवण्यात आले. काही तास ही गाडी उभी होती परंतु रेल्वे प्रशासनाकडून कोणतीच मदत करण्यात आली नाही, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.