नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जेव्हा जेव्हा आरोप झाले, तेव्हा तेव्हा त्यांनी खुलासा केला, मात्र राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा कधीही खुलासा केला नाही आणि महाविकास आघाडीतील नेते त्यावेळी मूग गिळून बसले होते, अशी टीका राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

हेही वाचा – “संकटात आम्ही संजय राठोड यांच्यासोबत होतो”, मुख्यमंत्री शिंदेंचे विधान; म्हणाले, “पूजा चव्हाण प्रकरणात…”

हेही वाचा – “आता पैसे देणाऱ्यांचे सरकार आले आहे”, देवेंद्र फडणवीसांचा आघाडीला टोला; म्हणाले, “फुटकी कवडी न देणाऱ्यांना..”

सुधीर मुनगंटीवार नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. विरोधी पक्षाने राज्यपालांबद्दल अपशब्दांचा उपयोग करत टीका केली होती. त्यांची नवीन संकल्पासाठी पुढील वाटचाल असणार आहे, संजय राऊत यांच्या वक्तव्याकडे फारसे गंभीरपणे बघितले जात नाही. त्यांच्या पक्षातील नेते त्यांना गंभीरपणे घेत नाही. राऊतांची नवीन डिक्शनरी तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही सांगा, असे मुनगंटीवार यांनी राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले.