नागपूर: उद्धव ठाकरे सरकारने ओबीसी संदर्भात केस टिकवली असती तर आज ही परिस्थिती आली नसती. खरे तर त्यांनी मराठा समाजाची माफी मागायला पाहिजे अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुनगंटीवार नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी ज्या प्रकारचा राजकारण केले ते जनतेला आवडले नाही. निवडून भारतीय जनता पार्टी सोबत आले आणि जनतेच्या भावनांची प्रताडणा करत महाविकास आघाडीत गेले. या सगळ्या गोष्टीला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली.

उद्धव ठाकरे फक्त चॅनलवरून सांगण्याचा प्रयत्न करतात की देश कसा आम्हाला सांभाळायचा आहे व्हाट्सअप आणि फेसबुक वरून कॉमेंट करणारे आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा पहिले पोरांनी बोलायचं मग वडिलांनी बोलायचं आणि जनतेत भ्रम निर्माण करायचा आम्ही मात्र विकास कामांमध्ये दंग राहतो.

हेही वाचा… सावधान! महागडी विदेशी दारू बनावट तर नाही ना…

राज्याची प्रगती झाली पाहिजे यासाठी काम करतो जनतेच्या फायद्याचा विचार आम्ही करतो हे पूर्ण रिकामे आहे आणि म्हणून हे रोज नकारात्मक बोलतात एवढाच त्यांचा राजकारणाचा धंदा राहिला आहे. हे कधीच सांगत नाही की आम्ही हे केले होते. कारण त्यांच्याकडे काही सांगण्यासारखे नाही अशी टीका मुलगा मुनगंटीवार यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण विषयावर त्यांचा काय भाव होता. मूक मोर्चा संदर्भात त्यांनी कोणते विडंबनात्मक शब्द वापरले होते. खरे तर राज्याच्या परिस्थितीला बाधा येईल असं भाष्य करू नये. आज आम्ही सत्तेत आहे उद्या अजून कोणी येईल .तुम्ही आम्ही कायम राहणार नाही, मात्र राज्य कायम राहणार आहे . लोकशाहीमध्ये मुद्द्यावर राजकारण व्हावे गुद्यावर होऊ नये असेही मुनगंटीवार म्हणाले.