ब्रम्हपुरी तालुक्यात वाघांनी उच्छाद मांडला आहे. आठवडाभरात वाघांनी चार बळी घेतल्याने संपूर्ण तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.तालुक्यातील अड्याळ शेतशिवारात आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. विलास विठोबा रंधये (४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, ब्रम्हपुरी उत्तर वनपरिक्षेत्रामध्ये मोडणाऱ्या आणि ब्रह्मपुरीपासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या अड्याळ येथील मेंढाचे रहिवासी विलास रंधये त्यांच्या शेतात सुरू असलेल्या निंदन कामाची जंगलालगतच्या उंच बांधीवर उभे राहून पाहणी करीत होते. दरम्यान वाघाने त्यांच्यावर झडप घेऊन त्यांच्या नरडीचा घोट घेतला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही आठवडाभरतील चौथी घटना आहे. या घटनेमुळे ब्रम्हपुरी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून शेत शिवारात काम करायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आठवडाभरात चार बळी घेणाऱ्या वाघांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.