लोकसत्ता टीम

नागपूर: भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यपातळीवर ‘गाव चलो’ अभियान सुरू केले आहे. नागपूरमध्ये या योजनेची सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह बुथपातळीवरील सर्व प्रमुख आणि स्थानिक नेते त्यात सहभागी झाले. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून फडणवीस यांनी काटोल तालुक्यातील पारडशिंगा या गावाला भेट दिली. त्यानंतर हातला गावाला भेट देऊन त्यांनी ग्रामस्थांशी ‘चायपे चर्चा’ केली.

Devendra Fadnavis urged Chhatrapati Sambhaji Raje to protest Congress regarding Shiva memorial
शिव स्मारकबद्दल संभाजी राजे छत्रपतींनी काँग्रेसचाही निषेध करावा; देवेंद्र फडणवीस
aheri assembly constituency
Aheri Assembly Constituency : अहेरी विधानसभा मतदारसंघ :…
Vishwas Ugle captured motherly moment on camera with little Tara lovingly cuddling her calf
ताडोबातील “छोटी तारा” च्या मातृत्वाचा क्षण…
Parvesh Shaikh used fake documents to secure a Soil Conservation contract
कंत्राटदार परवेशला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस, काय आहे प्रकरण ?
In Gangajamuna settlement of Nagpur police caught and beat up people and recovered them
नागपूर: बदनाम वस्तीतील पोलीस चौकीत हे काय सुरू आहे?
Bachu Kadu comments Prahar Jan Shakti Party MLA Rajkumar Patel prepares to quit party
आमदार राजकुमार पटेल ‘प्रहार’ सोडणार?… बच्‍चू कडू स्‍पष्‍टच बोलले….
father thrown his two dauthers in river in buldhana district
पोटच्या लेकींना पित्याने नदीत फेकले
Clashes erupted between supporters of BJP leader Munna Yadav and his relative Balu Yadav
वादग्रस्त यादव कुटुंबीयांमध्ये पुन्हा वाद,तलवारी निघाल्या पोलिसांना …
Leopard Nate area, Ratnagiri, Leopard, loksatta news,
रत्नागिरी : नाटे परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याची दहशत, विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश

फडणवीस यांनी पारडसिंगा या गावात कार्यकर्त्यांच्या घरी रात्री मुक्काम केल्यावर गुरुवारी सकाळी हताला गांवला भेट दिली. तेथे त्यांनी ग्रामस्थ शेतकऱ्यांशी ‘चाय पे चर्चा’ केली. या दरम्यान त्यांनी शेतमाल विक्रीसह शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी त्यांना त्यांच्या समस्या सांगितल्या. त्या सोडवण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ग्रामस्थांशी चर्चेमुळे माझी आजची सकाळ अधिक समृद्ध झाली. शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेमुळे त्यांनी सांगितलेल्या विविध समस्यांमुळे अनेक बाबींची माहिती झाली. त्यांच्या समस्या सोडवण्यचे आश्वासन त्यांना दिले.

आणखी वाचा-किमान समान कार्यक्रमाशिवाय आघाडी अशक्य, ॲड. प्रकाश आंबेडकरांची स्पष्ट भूमिका

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा सावनेर तालुक्यातील धापेवाडा या गावाला भेट देणार असून ग्रामस्थांशी चर्चा करणार आहे. प्रमुख नेत्यांसोबत जिल्ह्यातील इतरही नेते विविध गावांना भेटी देणार आहे.