वर्धा : जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. हा वळवाचा पाऊस नसून मोसमी पाऊस असल्याचे आणि तोही वेळेआधी आल्याचे म्हटले जात आहे. जिल्ह्यात सध्या मेघगर्जनेसह वादळी पाऊस मुक्कामी असल्याचे चित्र आहे. मंगळवारी दिवसाला ऊन्ह असल्याने आर्वी तालुक्याच्या कासारखेडा येथील शेतकरी व शेतमजुर कामासाठी शेतात गेलेत. तर सूर्यमावळतीला जात असताना वातावरणात अचानक बदल होत मेघगर्जसह परिसरात पाऊस कोसळला. याच वादळी पावसादरम्यान वीज पडून एका शेतक-याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला.
कासारखेडा शिवारात घडली. रमेश गुणवंत अड्डे (वय ४५ ), रा. कासारखेडा असे मृत शेतक-याचे तर वासुदेव महादेव अड्डे (वय ६५ ) रा. कासारखेडा असे गंभीर जखमी शेतक-याचे नाव आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसाने थैमान घातले आहे. थांबून थांबून जिल्ह्यातील विविध भागात वीज गर्जनेसह अवकाळी वादळी पाऊस कोसळत आहे. मंगळवारी सकाळी ऊन निघाल्याने आता अवकाळी पाऊस गेला असे नागरिकांकडून बोलले जात होते. तर कासारखेडा येथील शेतकरी व मजूर शेतात कामासाठी गेलेत. कासारखेडा येथील शेतकरी रमेश अड्डे व वासुदेव अड्डे त्यांच्या कासारखेडा शिवारातील शेतात काम करण्यासाठी गेले. पण दुपारी अचानक वातावरणा बदल झाला. शिवाय मेघगर्जनेसह परिसरात पाऊस कोसळला. याच दरम्यान वीज पडल्याने रमेश यांचा जागीच मृत्यू झाला तर वासुदेव हे गंभीर जखमी झाले. वीज पडून एक शेतकरी दगावल्याचे आणि एक गंभीर जखमी झाल्याची वार्ता परिसरात वा-यासारखी पसरल्याने घटनास्थळी नागरिकांनी तोबा गर्दी झाली. दरम्यान परिसरातील नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमीला तातडीने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. वासुदेव यांची प्रकृर्ती नाजूक असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची नोंद प्रशासनाने घेतली आहे.
अवकाळी पावसामुळे कामे विस्कळीत
सध्या शेतात मशागतीचे काम सुरु आहे. कासारखेडा शिवारातील शेतक-यांनी तीळ लागवड केल्याने कापणी करून काढणी सुरु आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतातील कामे विस्कळीत होत आहे. सोमवारी खरांगणा परिसरातील जोरदार पाऊस झाल्याने तीळ, जनावरांचा जारा, भाजीपाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज सायंकाळी परत पाऊस बरसला. काळेकुट्ट आभाळ राहले. मधून विजेचा कडकडाट पण होता. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले.