अमरावती : आम्ही कॉंग्रेस पक्षाचे पाईक आहोत आणि आम्ही आमच्या विचारांवर कायम आहोत. आम्ही जनमताचा असा अपमान कदापि करू शकत नाही. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनहिताचे काम सातत्याने करीत राहू, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
हेही वाचा – “हे तर अपेक्षितच होते…”, नवनीत राणा यांची सूचक प्रतिक्रिया
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, आता जे खिचडी सरकार स्थापन झालेले आहे त्याला काहीही अर्थ नसून, हे सरकार फार काळ चालू शकणार नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये संविधानाची तोडफोड सातत्याने होत आहे, हे सहन करण्यासारखे नाही, आम्ही संविधानाचा मान राखला जावा यासाठी सक्षम विरोधी पक्ष म्हणून कार्य करू.