यवतमाळ : महागाव तालुक्यातील ब्राह्मी गावातील तरुणाला अहमदनगर जिल्ह्यातील गव्हाणवाडी येथील आठ जणांनी संगनमत करून अपहरण केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी अपहृत तरुणाच्या आईने पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात १२ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

हेही वाचा : नवनीत राणांविरुद्ध अकोल्यातही एल्गार!; राजकीय फायद्यासाठी दोन धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याचा आरोप

हेही वाचा : अकोला : नदीवरील पूल ओलांडतांना आजोबा व नातू नदीच्या प्रवाहात वाहून गेले

वैजंताबाई शेषराव लोखंडे (५०), रा. ब्राह्मी, ता. महागाव असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील गव्हाणवाडी येथे राहणारे कैलास ब्राह्मणे, रमेश गव्हाणे, संजय गव्हाणे, दीपक गव्हाणे, संजय पवार, अमोल पवार, अंकुश पवार व गोरख पवार यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजंताबाई यांना पाच मुले आहेत. सर्वात मोठा मुलगा ज्ञानेश्वर तर सर्वात लहान मुलगा पांडुरंग आहे. ते दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील गव्हाणवाडी येथे उदरनिर्वाहासाठी पाच ते सहा वर्षांपासून वास्तव्यास होते. वैजंताबाईचा २२ वर्षीय लहान मुलगा पांडुरंग अहमदनगर जिल्ह्यातील गव्हाणवाडी येथे राहून ड्रायव्हिंगचे काम करत होता. सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी वैजंताबाई यांचा मोठा मुलगा ज्ञानेश्वर व त्याची पत्नी ब्राह्मी गावात परत आले होते. त्यानंतर पांडुरंग हा गव्हाणवाडी येथे एका तरुणीला घेऊन आला. ते दोघेही ब्राह्मी गावातच गेल्या दहा ते बारा दिवसापासून राहत होते. दोघांनाही लग्न करायचे आहे म्हणून पांडुरंगाच्या आईला सांगितले.

हेही वाचा : मोदींवर टीका करताच नोकरी गमावली!; भंडाऱ्यातील पोलीस उपनिरीक्षकाची हकालपट्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेच्या दिवशी १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान कैलास ब्राह्मणे हे सात आरोपींना सोबत घेऊन त्यांची मुलगी गुड्डीला (बदललेले नाव) पळवून आणल्याचा आरोप करीत भेटण्यासाठी आले. आरोपींनी संगनमत करून गुड्डीला कसे काय आणले, असा जाब विचारत वाद निर्माण केला. त्यानंतर आठही आरोपींनी संगनमत करून पांडुरंगसह गुड्डीला घेऊन वाहनात टाकून पसार झाले. याप्रकरणी तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आठ जणाविरोधात गुन्हे दाखल केले आहे. प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.