नाशिकमधील देवळा तालुक्यातील उमराणेजवळ महामार्गावर मंगळवारी सकाळी बस आणि मालमोटार यांच्यात धडक होऊन ४० प्रवासी जखमी झाले. यातील आठ जण गंभीर असल्याने त्यांना मालेगांव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा- नाशिक : वसंत व्याख्यानमाला शताब्दी महोत्सव स्वागत समिती अध्यक्षपदी दादा भुसे, राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनाही आमंत्रण

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी

मंगळवारी सकाळी नऊ वाजता मुंबई-आग्रा महामार्गावरील उमराणेनजीकच्या सांगवी येथे गतिरोधकाजवळ भरधाव नाशिक- चाळीसगांव बसची समोरुन येणाऱ्या मालमोटारीला धडक बसली. या अपघातात बसमधील ४० प्रवासी जखमी झाले. यातील आठ प्रवासी गंभीर जखमी असल्याने त्यांना मालेगांव येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये वाहन चालक जितू पवार, वाहक योगेश राठोड, नामदेव आहेर, विजय पवार (दिंडोरी), विजया खाडे, पुरुषोत्तम खाडे, सुभाष बोरसे, प्रदीप पाटील, प्रशांत बोरसे, आशा पवार, श्याम विसपुते, कमल साळुंखे, आप्पा मोरे, भालचंद्र चिंचोळे, विजय पवार, मंगला चिंचोले ( सर्व रा.नाशिक) आदींचा समावेश आहे .या सर्व जखमींना उमराणे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उमराणे येथील जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, उमराणाचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत देवरे, माजी सभापती विलास देवरे यांनी धाव घेत कृषी उत्पन्न बाजार समिती आणि टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना मालेगाव, उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयात हलविल. देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- कायद्यानुसार सत्यजित तांबे यांना अपक्षच राहावे लागणार

अपघाताची मालिका सुरूच

मागील दोन-तीन महिन्यांपासून जिल्ह्यात बससेवेला अपघात होण्याच्या अनेक घटना घडल्या. पंचवटीत औरंगाबाद रस्त्यावरर यवतमाळ येथील खासगी बस अपघातग्रस्त झाल्यानंतर पेटल्यान १३ हून अधिक प्रवाश्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सप्तश्रृंग गडावर जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस पेटली. यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. सिन्नरजवळ शिवशाही बसने पेट घेतल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरुप उतरविण्यात आले. त्यानंतर बस खाक झाली. अशा घटना घडल्या आहेत.