नाशिक : राज्य सरकारच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयकातील काही नियम जाचक असून त्या विरोधात इगतपुरी कृषी सेवा केंद्र चालकांनी तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रांचे तालुकाध्यक्ष सोमनाथ काळे यांनी दिली.

राज्य सरकारने नवीन प्रस्तावित कायद्यात कृषी दुकानांसंदर्भात काही जाचक अटी आणि नियम लागू करण्याचे ठरवले असल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांचे म्हणणे आहे. संबंधित जाचक अटी आणि नियमांच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कृषी केंद्र दोन ते चार नोव्हेंबर या कालावधीत बंद राहणार आहेत. इगतपुरी तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचाही यात समावेश आहे.

हेही वाचा : द्वारकाधीश कारखान्यास पाच लाख टन ऊस मिळाल्यास तीन हजार रुपयांचा भाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन तहसीदार, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकरी यांना देण्यात आले आहे. यावेळी इगतपुरी तालुकाध्यक्ष सोमनाथ काळे, अरुण वाजे, देवचंद काळे, हेमंत सुराना, पंकज गोठी आदी उपस्थित होते.