नाशिक : प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने देवळा तालुक्यातील उमराणे येथून शेतकऱ्यांनी कांदा भरलेले ट्रॅक्टर घेऊन पिंपळगाव बसवंत येथील नाफेड कार्यालयावर मोर्चा काढला. नाफेड कार्यालयासमोर टँकर उभे करीत ठिय्या आंदोलन सुरू केले. सायंकाळपर्यंत हे आंदोलन सुरू होते. परंतु, कुणी दखल न घेतल्याने आंदोलकांनी नाफेड कार्यालयास कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शेतकरी ट्रॅक्टर घेऊन माघारी फिरले.

हेही वाचा : मनमाड : नववर्षातही रेल्वे गाड्यांना विलंब

Assistant Police Inspector promoted soon
आनंदाची बातमी! सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती
Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
major anuj sood marathi news, major anuj sood latest marathi news
शहीद जवानाच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ देण्याचे प्रकरण : मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही हे सरकारने प्रतिज्ञापत्रावर सांगावे, उच्च न्यायालयाचे ताशेरे
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…

कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी, नाफेडने बाजार समितीतच खरेदी करावी, कांदाला सरासरी चार हजार रुपये भाव द्यावा, नाफेडने पारदर्शी खरेदी करावी, एक महिन्यात कांदा दरात होणारी घट, या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यांसाठी शेतकरी नाफेड कार्यालयावर धडकले. सकाळी ११ वाजता उमराणे येथील उत्पादक शेतकरी प्रहार संघटनेचे फलक ट्रॅक्टरला लाऊन पिंपळगाव बसवंत येथील महामार्गावरील नाफेड कार्यालयावर आले. या ठिकाणी ठिय्या देऊन त्यांनी आंदोलन सुरू केले. केंद्र सरकारच्या कांदा धोरणाचा निषेध केला. महिनाभरात कांदा दरात मोठी घसरण झाली. नाफेडची खरेदी फसवी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

हेही वाचा : नाशिक : इंदिरानगरात गॅस गळतीमुळे आगीत दोन जण जखमी

व्यापारी व नाफेड खरेदीतील तफावत मांडली. संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. परंतु, लोकप्रतिनिधींसह अन्य अधिकारी यांनी दखलही घेतली नाही अथवा ठोस आश्वासन मिळाले नाही. अखेर नाफेड कार्यालयाला काहींनी कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे बापू देवरे, कुष्णा जाधव, हरिसिंग ठोके, स्वप्निल आहेर, स्वप्निल सूर्यवंशी, हेमंत निकम आदी पदाधिकारी ५० शेतकऱ्यांसह आपले कांदा भरलेले ट्रॅक्टर घेऊन निघून गेले.