नाशिक – तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरजवळील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करताना ५५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा – “…तर पंकजा मुंडेंबरोबर युती करू”, बच्चू कडू यांचं मोठं विधान

हेही वाचा – लाचखोर जीएसटी अधिकाऱ्यास पोलीस कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन नाशिक येथील निर्मला जगताप या मुलगा, सून आणि नातू यांच्या समवेत श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकेश्वर येथे गेल्या होत्या. प्रदक्षिणा पूर्ण करीत असताना चक्कर आल्याने त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.