नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत निवडणुकीच्या कामाबाबतची लगबग सुरू झाली असून पालिका आयुक्तांनी प्रभाग रचनेसाठीच्या समितीची स्थापना केली आहे तर दुसरीकडे १४ गावांचाही सहभाग असल्याने तेथील प्रभागरचनेच्या कामालाही गती आली आहे. स्थानिक नागरिक तसेच ग्रामसेवक यांच्या सहकार्याने प्रभागरचनेच्या कामाला वेग आला आहे.

प्रभागरचनेच्या कामासाठी अधिकारी गावांमध्ये येऊन माहिती घेत आहेत. ग्रामसेवक व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. अधिक योग्य सीमांसाठी स्थानिकांनाही विचारणा करण्यात येत आहे. त्या भागातही प्रभागरचनेसाठी व त्यांच्या सर्वेक्षणासाठी कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेसाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी २०११ मधील जनसंख्या गृहीत धरली जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत प्रभाग वाढतील या आशेवर असलेल्यांची मात्र निराशा झाली आहे. प्रभागरचना कशी होते याच्यावरच राजकीय गणितांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरायचेच या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्यांचे डोळे या प्रभागरचनेकडे लागले आहेत.

१४ गावांमध्ये निवडणुकांसाठी व अनेक वर्षापासून प्राथमिक सुविधांपासून वंचित राहिल्याने या गावांचा विकास व्हावा व मूलभूत नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी १४ गावांचे नागरीकही निवडणुकीची वाट पाहत आहेत. पालिका निवडणुकीत ४ सदस्यांचा १ प्रभाग होणार असल्याने सदस्यांची संख्या वाढणार नाही. दुसरीकडे यावेळी ११२ नगरसेवक होणार आहेत. त्यामध्ये नवी मुंबई महापालिकेतून जी १४ गावे वगळली होती व त्यानंतर पुन्हा ती नवी मुंबईत समाविष्ट केली त्यामुळे या १४ गावांसह पालिकेची आगामी निवडणूक होणार आहे. त्यामुळे या १४ गावातील नागरिकांनाही निवडणुकानंतर तरी गावांना लोकप्रतिनिधी मिळाल्यावर गावांचा विकास होईल अशी आशा आहे. त्यामुळे पालिकेने सुरू केलेल्या प्रभागरचनेसाठी शासकीय पातळीवर ग्रामसेवक तसेच स्थानिक माहितीसाठी ग्रामस्थांची मदत घेतली जात आहे.

प्रभागरचनेच्या कामासाठी अधिकारी गावांमध्ये येऊन माहिती घेत आहेत. तसेच अधिक योग्य सीमांसाठी स्थानिकांनाही विचारणा करण्यात येत आहे. प्रभागरचनेच्या कामासाठी योग्य ते माहितीपर सहकार्य करत आहोत. १४ गावांचा सहभाग कसा असेल आमची गावे कोणत्या प्रभागाला जोडली जाणार आणि प्रभागरचना कशी असेल याकडे आमचेही लक्ष आहे. – लक्ष्मण पाटील, अध्यक्ष १४ गाव सर्वपक्षीय समिती

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पालिकेच्या प्रभागरचनेसाठी आवश्यक नकाशे, येथील हद्दी याबाबत प्रभागरचना करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय माहिती विचारली जात असून त्याबाबतची माहिती व सहकार्य करण्यात येत आहे. – जगदीश मडके, ग्रामसेवक ग्रुप ग्रामपंचायत, नारीवली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाच्या निर्देशानुसार प्रभागरचनेची कामे करण्यात येत आहेत. १४ गावांबाबत व तेथील अपेक्षित माहिती तिथले ग्रामसेवक व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. त्या भागातही प्रभागरचनेसाठी व त्यांच्या सर्वेक्षणासाठी कामाला सुरवात करण्यात आली आहे. – भागवत डोईफोडे, उपायुक्त, निवडणूक विभाग, नवी मुंबई महापालिका