नवी मुंबई : नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या जवळील भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्दीकरण केंद्र येथील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने १० तासांच्या देखभाल दुरुस्तीमुळे नवी मुंबई शहराबरोबरच मोरबे येथून पाणीपुरवठा होणाऱ्या कामोठे व खारघर परिसरांनाही याचा फटका बसणार आहे. त्यामुळे संपूर्ण नवी मुंबईसह खारघर व कामोठे भागांतही पाणीपुरवठा होणार नसून गुरुवारी सकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे बुधवारी व गुरुवारी नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

हेही वाचा : समाज माध्यमांतील जाहिरातींच्या आधारे सट्टा बाजारात गुंतवणूक करताय? सावधान! होऊ शकते फसवणूक

Water scarcity, Badlapur, Ambernath,
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली

मुंबईच्या तुलनेत नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणात ४९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. परंतू शहरातील नागरिकांना सुरळीत व सुव्यवस्थिपणे पाणीपुरवठा होण्यासाठी मोरबे धरणानजीकच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व बसवण्यासाठी तब्बल १० तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराबरोबरच खारघर व कामोठे या ठिकाणच्या भागांनाही मोरबे धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या खारघर तसेच कामोठे भागातही सिडको नोडसाठी मोरबे धरणातून जवळजवळ ५० एमएलडी पाणीपुरवठा करते. त्यामुळे या विभागांनाही पाण्याबाबत खबरदारी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा : पनवेल : रंगपंचमीत दोन गटातील हाणामारीत पोलिसांना धक्काबुक्की

मोरबे धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नवी मुंबईत इतर शहरांच्या मानाने पाण्याची गंभीर समस्या जाणवत नाही. परंतू देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मोठा अवधी लागतो. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

देखभाल दुरुस्तीसाठी १० तास भोकरपाडा येथील जलशु्धीकरण केंद्रातील जलपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने बुधवारी संध्याकाळी शहरात होणारा पाणीपुरवठा बंद राहील तसेच गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.

अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता, मोरबे धरण प्रकल्प